• Download App
    देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांच स्पष्ट प्रतिपादन As soon as the right time comes, the Civil Code will be implemented in the country

    देशात योग्य वेळ येताच सामान नागरी कायदा लागू; गृहमंत्री अमित शाहांचे स्पष्ट प्रतिपादन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात समान नागरी कायदा लागू करणे हा जनसंघाचा पूर्वीपासूनचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही देशात सामान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होताच लागू करण्यात येईल, त्यासाठी संसदेत कायदा संमत करू, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. As soon as the right time comes, the Civil Code will be implemented in the country

    ‘भारत जोडो’ यात्रेचे अद्याप राजकीय पातळीवर विश्लेषण करता येणार नाही, तरीही राहुल गांधी फिरत आहेत ही चांगली बाब आहे. कर्नाटकात मागील निवडणुकीत भाजपाला ८ जागा कमी पडल्या होत्या, गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीचा चांगला परिणाम कर्नाटकात पडेल, अशी अपेक्षा आहे. कर्नाटकात कोणताही बदल करण्याचा विचार अजून नाही. काश्मीरमध्ये कालपर्यंत लोकशाही अस्तित्वात नव्हती, देशात पंचायत, विधानसभा आणि संसद अशी त्रिसदस्यीय लोकशाही आहे.


    Amit Shah Interview : अमित शाह म्हणाले, पीएम मोदींच्या सार्वजनिक आयुष्यातील तीन भाग, जोखीम घेऊन निर्णय घेण्यात सर्वात पुढे… वाचा सविस्तर…


    मात्र तिकडे कालपर्यंत काश्मीरमध्ये ही व्यवस्था नव्हती, आज नरेंद्र मोदी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये ३० हजार सरपंच निवडून आले आणि तिथे लोकशाही गाव पातळीपर्यंत पोहचवली. काश्मीरमध्ये कालपर्यंत दशतवाद्यांच्या विरोधात आपण लढत होतो, पण दहशतवादाला पोसणाऱ्यांना कधी हात लावला नव्हता, त्यांचा मोदी सरकारच्या काळात सुपडा साफ केला आहे. ५ वर्षांत जम्मू काश्मीरमध्ये ५७ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. तिथे ८० लाख पर्यटक आले आहेत.

    पंजाबातील परिस्थितीत हाताबाहेर जाऊ देणार नाही 

    पंजाबमध्ये सरकार बदलल्यानंतर परिस्थितीत बदलली आहे, पण तरीही आम्ही तेथील परिस्थितीत हाताबाहेर जाऊ देणार नाही. केंद्र आणि राज्य मिळून त्यावर योग्य पाऊल उचलू. १९४७ पर्यंत भारताला नशामुक्त भारत करण्याचा नरेंद्र मोदींचा संकल्प आहे. पाकिस्तानचा धोका सीमेच्या पलीकडेच ठेवू. तो सीमेच्या आतमध्ये आणू देणार नाही, असे सांगत पीओके हा भारताचाच भाग आहे, असेही अमित शाहा म्हणाले.

    कुणावर अन्याय करणार नाही आणि कुणाचे तुष्टीकरणही करणार नाही. सीएए हा लागू करणारच. देशात ६० % नक्षलवाद संपुष्टात आला आहे. आपल्या देशात तीन स्तरीय न्यायव्यवस्था आहे. संजय राऊत यांच्याबाबत जो निकाल ईडी न्यायालयाने दिला आहे, त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, असेही अमित शाहा म्हणाले.

    As soon as the right time comes, the Civil Code will be implemented in the country

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India-EU FTA : केंद्राने EUच्या सफरचंदांवर आयात शुल्क कमी केले; 50 ऐवजी 20% केले, हिमाचल सफरचंद उद्योगावर संकट

    Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही

    Beating Retreat 2026 : विजय चौकात बीटिंग रिट्रीट समारंभ; तिन्ही सशस्त्र दलांनी राष्ट्रपती मुर्मू यांना राष्ट्रीय मानवंदना दिली; उपराष्ट्रपती आणि PM देखील उपस्थित