- अशी काय मजबूरी आहे की काँग्रेसला द्रमुकसोबत रहावे लागत आहे? असा सवालही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी द्रमुक खासदार सेंथिल कुमार एस यांनी गोमूत्राबाबत केलेल्या टिप्पणीवर जोरदार प्रहार करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.Anurag Thakurs strong counterattack on Senthil Kumars cow urine Stetment
अनुराग म्हणाले, ‘उत्तर भारतीयांवर कमेंट केल्याने असे दिसून येते की या लोकांनी हे एकदा नाही तर अनेक वेळा केले आहे. त्याची सुरुवात राहुल गांधींनी केली होती. अशी काय मजबूरी आहे की काँग्रेसला द्रमुकसोबत रहावे लागत आहे?
अनुराग म्हणाले, ‘ते (काँग्रेस) ईव्हीएमला दोष देत राहतात पण आता कारणे त्यापलीकडे जाऊ लागली आहेत. त्याची सुरुवात अमेठीत राहुल गांधींच्या पराभवानंतर झाली होती. उत्तर भारतीयांना अपमानित करण्याचे काम करण्यात आले होते.
सेंथिल कुमार यांनी मंगळवारी संसदेत म्हटले होते की, भाजप फक्त गोमूत्र असलेल्या राज्यांमध्येच निवडणुका जिंकतो. सेंथिल यांनी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाबद्दल सांगितले आणि ते म्हणाले की, देशातील जनतेने विचार केला पाहिजे की भाजपची ताकद मुख्यत्वे हिंदी भाषिक प्रदेशातील निवडणुका जिंकण्यासाठी आहे. ज्या राज्यांना आपण सामान्यतः गोमूत्र राज्य म्हणतो.
Anurag Thakurs strong counterattack on Senthil Kumars cow urine Stetment
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!