• Download App
    ओमिक्रॉनचा दुसरा बळी ओडिशात; महिलेने गमावला जीव; रुग्णसंख्या निरंतर वाढल्याने चिंता । Another victim of Omicron in Odisha; Woman loses life; Anxiety due to continuous increase in the number of patients

    ओमिक्रॉनचा दुसरा बळी ओडिशात; महिलेने गमावला जीव; रुग्णसंख्या निरंतर वाढल्याने चिंता

    वृत्तसंस्था

    कटक : ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव देशात वेगानं वाढत असून या आजाराने देशात दुसरा बळी गेला आहे. ओडीशातील बोलांगीरमधील एका महिलेचा ओमिक्रॉनमुळे मृत्यू झाला. यापूर्वी राजस्थानच्या उदयपूरमध्ये वृद्धाचा ओमिक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाला होता. Another victim of Omicron in Odisha; Woman loses life; Anxiety due to continuous increase in the number of patients

    संबलपूर जिल्ह्यातील वीर सुरेंद्र साई वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेला ओमिक्रॉनची लागण झाली होती, असे उघड झाले आहे.



    अगलपूर गावची रहिवासी असलेली ही महिलेला गेल्या महिन्यात पक्षाघात झाला होता. २० डिसेंबर रोजी बालांगीरच्या भीमा भोई वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचारादरम्यान, महिलेला संबलपूर बुर्लामध्ये रेफर केले होतं. त्यानंतर प्रकृती खालावल्यानंतर कोरोना चाचणीसाठी सॅम्पल घेतले. पुढच्या दिवशी म्हणजेच, २३ डिसेंबर रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

    जयपूरमध्ये पहिला मृत्यू

    जयपूरमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीला मधूमेहासह आणखी काही आजार होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु, अहवाल येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाल्याचे सांगितले जात आहे.  आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, ओमिक्रॉन संसर्गाचा अहवाल येण्याआधी या व्यक्तीचा मृत्यू झाला असला तरी त्याचा मृत्यू हा ओमिक्रॉनमुळेच झाला आहे. कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीवर नियमानुसार उपचार सुरू होते.

    Another victim of Omicron in Odisha; Woman loses life; Anxiety due to continuous increase in the number of patients

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे