• Download App
    'खास उद्देशाने' पाकिस्तानातून भारतात आली आहे अंजू, आयबी आणि पोलिसांच्या तपासात खुलासा Anju came to India from Pakistan for special purpose IB and police investigation revealed

    ‘खास उद्देशाने’ पाकिस्तानातून भारतात आली आहे अंजू, आयबी आणि पोलिसांच्या तपासात खुलासा

    • अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रश्न

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू भारतात परतली आहे. अंजू का परत आली आहे, ती कायमची भारतात आली आहे की पाकिस्तानात परतणार आहे? तिचा भारतात येण्याचा उद्देश काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये आयबी आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर संस्थेनी अंजूची अनेक तास चौकशी केली. या दरम्यान तिने अनेक खुलासे केले. Anju came to India from Pakistan for special purpose IB and police investigation revealed

    यादरम्यान अंजूने सांगितले की, ती २१ जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. दरम्यान, पाकिस्तानी नागरिक नसरुल्लासोबत लग्न करण्यापूर्वी तिने ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर तिने इस्लामिक रितीरिवाजांनुसार नसरुल्लाशी लग्न केले. मात्र, चौकशीदरम्यान अंजूने सांगितले की, सध्या तिच्याकडे लग्नाशी संबंधित कोणतेही कागदपत्र नाहीत.



    आयबी आणि पोलिसांनी अंजूची पाकिस्तानी संरक्षण कर्मचार्‍यांसोबतच्या संबंधांबद्दल चौकशी केली, ज्यात तिने सांगितले की तिचा पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही कर्मचार्‍यांशी संबंध नाही किंवा ती सैन्यात कोणाला ओळखत नाही. अंजूबाबत सर्वसामान्यांच्याच नव्हे तर पोलिसांच्याही मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, हे विशेष.

    पोलिसांनी अंजूला पाकिस्तानात परत जाण्याबाबतही विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अंजूने सांगितले की, ती पती अरविंदला घटस्फोट देण्यासाठी भारतात आली आहे. तिने असेही सांगितले की या काळात ती आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेण्याचा प्रयत्न करेल जे आजकाल वडिलांसोबत राहत आहेत.

    Anju came to India from Pakistan for special purpose IB and police investigation revealed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र