• Download App
    केवळ नेत्यांना एकत्र करून अलायन्स होत नाही!!; INDIA आघाडी गठनानंतर केजरीवालांचा व्हिडिओ व्हायरल|An alliance is not made by just bringing together leaders!!; Kejriwal's video goes viral after INDIA Aghadi formation

    केवळ नेत्यांना एकत्र करून अलायन्स होत नाही!!; INDIA आघाडी गठनानंतर केजरीवालांचा व्हिडिओ व्हायरल

    प्रतिनिधी

    मुंबई : बंगलोर मध्ये 26 पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन विरोधकांची नवी INDIA आघाडी स्थापन केली. या आघाडीत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवालही सहभागी झाले. त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेला संबोधित देखील केले.An alliance is not made by just bringing together leaders!!; Kejriwal’s video goes viral after INDIA Aghadi formation

    केजरीवाल यांच्या नव्या INDIA आघाडीत सामील होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. देशातल्या फक्त नेत्यांना एकत्र करून कोणत्याही अलायन्स होणार नाही, तर 140 कोटी जनतेला एकत्र केल्यावर काही अलायन्स तयार होऊ शकेल. हे तोडामोडीचे राजकारण मला काही कळत नाही. किंवा आघाड्या मला करता येत नाहीत, असे केजरीवाल एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांचा तोच व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्याच व्हिडिओत ते बंगलोरमध्ये विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीला सामील होण्यासाठी जात असल्याचेही दिसत आहे.



    मला तोडामोडीचे राजकारण, आघाड्या हे काही समजत नाही. तुम्हाला शाळा बनवायची असेल, हॉस्पिटल बनवायचे असेल, रस्ते बनवायचे असतील तर मला बोलवा, तुम्हाला वीज कनेक्शन ठीक करायचे असेल तर मला बोलवा कारण मी आयटी इंजिनियर आहे. राजकारणी नाही, असे केजरीवाल त्या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

    पण केजरीवाल प्रत्यक्षात कालच्या बंगलोर मधल्या नव्या INDIA आघाडीत सामील होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात उतरले आहेत. केजरीवालांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून विसंगत राजकीय भूमिका समोर आली आहे.

    An alliance is not made by just bringing together leaders!!; Kejriwal’s video goes viral after INDIA Aghadi formation

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- राहुल थकू नका, तुम्हाला तामिळनाडू-बंगालमध्येही हरायचे आहे, त्यांना विकासाचे राजकारण समजत नाही

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा