• Download App
    मणिपूरवर चर्चेसाठी विरोधकांचे सहकार्य मागण्यासाठी अमित शाहांचे मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरींना पत्र!!|Amit Shah's letter to Mallikarjun Kharge, Adhir Ranjan Chowdhury seeking opposition's support for discussion on Manipur

    मणिपूरवर चर्चेसाठी विरोधकांचे सहकार्य मागण्यासाठी अमित शाहांचे मल्लिकार्जुन खर्गे, अधीर रंजन चौधरींना पत्र!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मणिपूर मधील हिंसाचार आणि तिथल्या परिस्थितीवर संसदेत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य मागणारे पत्र लिहिले आहे. मणिपूर मधल्या सर्व राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. यासाठी सर्व विरोधकांचे सरकारला सहकार्य हवे आहे. ते आपण करावे, अशी विनंती अमित शाह यांनी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना केली आहे.Amit Shah’s letter to Mallikarjun Kharge, Adhir Ranjan Chowdhury seeking opposition’s support for discussion on Manipur



    हिंसाचार ग्रस्त मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख देखील अमित शाह यांनी या पत्रात केला आहे. त्याचबरोबर मणिपूरशी संबंधित सर्व विषयांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी दर्शविली आहे.

    मणिपूरच्या मुद्द्यावर गेला आठवडाभर सर्व विरोधक संसदेचे कामकाज रोखून धरत आहेत. सरकारची चर्चेची तयारी असताना देखील संसदेत गदारोळ घालत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दोन्ही सदनाच्या विरोधी पक्ष नेत्यांना लिहिलेले पत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. या पत्राला दोन्ही विरोधी पक्ष नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही दोन्ही पत्रे शेअर केली आहेत.

    Amit Shah’s letter to Mallikarjun Kharge Adhir Ranjan Chowdhury seeking opposition’s support for discussion on Manipur

    महत्वाच्या बातम्या 

     

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!