• Download App
    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना यश, आसाम - मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे Amit shahs efforts fruitfulled

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांना यश, आसाम – मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी – आसाम आणि मिझोराममधील तणाव निवळण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या राज्यांतील नेत्यांविरोधात दाखल केलेले ‘एफआयआर’ मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याकामी पुढाकार घेत आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांच्याशी चर्चा केली. Amit shahs efforts fruitfulled

    दोन्ही राज्यांचे पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष होऊन त्यात आसामच्या पाच पोलिस आणि एका नागरिकांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तणाव कमी करण्याच्या सूचना दोन्ही राज्यांना दिल्या होत्या.

    यामुळे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी मिझोरामचे खासदार के. वनलालवेणा यांच्याविरोधात आसाम पोलिसांनी नोंदविलेला ‘एफआयआर’ मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर मिझोराम सरकारनेही सरमा यांच्याविरोधात दाखल केलेला ‘एफआयआर’ मागे घेतला. सीमावाद चर्चेच्या माध्यमातूनच सोडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

    Amit shahs efforts fruitfulled

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची