• Download App
    कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या अखिलेश यादव यांना लाज वाटली पाहिजे, अमित शहा यांची टीका|Akhilesh Yadav should be ashamed of lying about law and order, criticizes Amit Shah

    कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या अखिलेश यादव यांना लाज वाटली पाहिजे, अमित शहा यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील यापूर्वीच्या राजवटीत फोफावलेले गुन्हेगार व माफिया यांना राज्यातील भाजप सरकारने पळवून लावले आहे. असे असताना राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना लाज वाटत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.Akhilesh Yadav should be ashamed of lying about law and order, criticizes Amit Shah

    अखिलेश यादव व राष्ट्रीय लोकदलाचे प्रमुख जयंत चौधरी यांनी ऐक्याचे प्रदर्शन केल्याबद्दल शहा यांनी त्यांची खिल्ली उडवली. या पक्षांचे नेते फक्त निवडणुकीपर्यंत एकत्र दिसतील. सरकार स्थापनेची वेळ येईल तेव्हा आझम खान व अतिक अहमद यांच्यासारख्यांना महत्त्व येईल आणि चौधरी कुठेही दिसणार नाहीत, असा टोला लगावला.



    शहा म्हणाले, २०१३ सालच्या मुझफ्फरनगर दंगलींचे जे बळी ठरले त्यांनाच आरोपी करण्यात आले हे कोण विसरू शकेल. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकार आणि त्यापूवीर्चे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्या कार्यकाळातील गुन्हेगारीची तुलनात्मक आकडेवारी करावी.

    यांनी पश्चिम उत्तर प्रदेशात भाजपसाठी मते मागताना जाट समाजाचे प्रमुख नेते आणि दिवंगत पंतप्रधान चौधरी चरणसिंह आणि शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांची आठवण केली. यापूर्वी बोलताना अमित शहा म्हणाले होते की जाट समाजाचे आणि भाजपचे गेल्या साडेसहा वर्षांपासूनचे संबंध आहेत.

    Akhilesh Yadav should be ashamed of lying about law and order, criticizes Amit Shah

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत