वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघाताबद्दल सोशल मीडिया वरून शंका आणि सवाल यांचे काहूर उठले असताना काही तज्ञ मंडळींनी काही तांत्रिक शंका उपस्थित केल्या आहेत. लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर यांच्या तपासानंतर विमान अपघाता संबंधी विशिष्ट खुलासे होऊ शकतील. तरीही एक शंका आहे ती म्हणजे अहमदाबाद विमानतळावरून विमान कडून 600 फुटांवर गेल्यानंतर देखील विमानाच्या लँडिंग गिअर डाऊन कसा??, या सवालाचे उत्तर मिळाले पाहिजे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीने ड्रीम लाइनर सारख्या मोठ्या विमानाचा अपघात होऊच कसा शकतो??, अशी कुशंका काढली, पण त्यापेक्षाही तज्ञ मंडळींनी काढलेल्या शंका आणि उपस्थित केलेले सवाल अधिक गंभीर आहेत.
विमानाच्या उड्डाणानंतर लँडिंग गिअर ताबडतोब अप करण्यात येतो. पण अहमदाबाद मधून विमान उडाले ते 600 फुटांवर पोहोचले तरी देखील लँडिंग गिअर अप झाला नाही. याचा अर्थ विमान हवे असताना इंजिनांमधल्या बिघाडाची कल्पना पायलटला आली होती म्हणूनच त्याने मे डे कॉल दिला. पण ड्रीम लाइनर विमानाची दोन्ही इंजिन एकदम बंद पडली का याचे उत्तर मात्र मिळू शकले नाही. ड्रीम लाइनर विमानाची इंजिन खूप मोठी असतात ती एकाच वेळी अक्षरशः एकाच मिनिटांच्या अवधीत बंद पडणे ही जवळपास अशक्य गोष्ट आहे पण तरी देखील ती घडली का??, अहमदाबाद विमानतळावर पक्ष्यांच्या धडकेमुळे काही घडले का??, याची माहिती अजून समोर आलेली नाही. अहमदाबाद विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्षी आहेत. त्या पक्ष्यांची धडक बसली असेल तरी ड्रीम लाइनर सारख्या मोठ्या विमानाची दोन्ही इंजिने एकदम बंद पडतील ही शक्यता फार दुरापास्त आहे.
या संदर्भात अनुभवी वैमानिक एहसान खालिद यांनी विशिष्ट अनुभव सांगून विमान अपघाता विषयी रास्त शंका उपस्थित केल्या आहेत. अर्थात विमान अपघाताची सखोल चौकशी होईल त्यामध्ये सर्व तांत्रिक बाबी तपासण्यात येतील त्यानंतरच कुठला ठोस निष्कर्ष काढता येईल, असे एहसान खालिद यांचे म्हणणे आहे.
Air India Plane Crash Former Pilot Ehsan Khalid says
महत्वाच्या बातम्या
- Karnataka : बेल्लारीतील काँग्रेस खासदार अन् कर्नाटकातील तीन आमदारांवर EDचे छापे
- DK Shivakumar : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार विराट कोहलीची RCB टीम खरेदी करणार?
- Rajiv Ghai : ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणारे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या मुलीची भावनिक पोस्ट चर्चेत!
- Rahul Gandhi : राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, आता उपस्थित केला ‘हा’ मुद्दा!