• Download App
    Air India cancels flights एअर इंडियाने ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली उड्डाणे

    Israel-Iran tensions : एअर इंडियाने ८ ऑगस्टपर्यंत रद्द केली उड्डाणे ; जाणून घ्या का घेतला हा निर्णय?

    एअर इंडिया दिल्ली ते तेल अवीव दर आठवड्याला चार उड्डाणे चालवते.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील तणावामुळे एअर इंडियाने इस्रायलमधील तेल अवीवकडे जाणारी उड्डाणे तत्काळ प्रभावाने स्थगित केली आहेत. एअर इंडियाने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मध्य पूर्वेतील काही भागांमध्ये असलेली तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, आम्ही तेल अवीव आणि तेथून आमच्या फ्लाइटचे नियोजित ऑपरेशन 08 ऑगस्ट 2024 पर्यंत तत्काळ स्थगित केले आहेत.” Air India cancels flights

    यासोबतच विमान कंपनी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या कालावधीत तेल अवीवमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रीशेड्युलिंग आणि प्रवास रद्द करण्याच्या शुल्कावर एकवेळ माफी देऊन मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



     

    “आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या 24/7 संपर्क केंद्रावर 011-69329333 / 011-69329999 वर कॉल करा,” असे निवेदनात म्हटले आहे.

    एअर इंडिया दिल्ली ते तेल अवीव दर आठवड्याला चार उड्डाणे चालवते. एअरलाइन कंपनीने त्यांच्या वेबसाइटवरील दुसऱ्या अपडेटमध्ये म्हटले आहे की, ऑपरेशनल कारणांमुळे त्यांनी 1 ऑगस्ट रोजी दिल्ली ते तेल अवीव आणि तेल अवीव ते दिल्ली अशी त्यांची AI140 उड्डाणे रद्द केली आहेत. असेही सांगण्यात आले आहे की, या दोन फ्लाइट्सवरील प्रवासासाठी निश्चित बुकिंग असलेल्या प्रवाशांना रीशेड्युलिंग आणि कॅन्सलेशन चार्जेसवर एकवेळ सूट दिली जाईल. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.

    Air India cancels flights

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!