• Download App
    ओवेसी तिहेरी तलाक कायद्याला म्हणाले असंवैधानिक, केंद्राला विचारले- पेगाससवर संसदेत चर्चेची भीती का? । AIMIM Chief Asaduddin Owaisi Says Triple Talaq Law In Unconstitutional And Asked Why Government Is Afraid Of Discussion On Pegasus

    ओवैसी तिहेरी तलाक कायद्याला म्हणाले असंवैधानिक, केंद्राला विचारले- पेगाससवर संसदेत चर्चेची भीती का?

    AIMIM Chief Asaduddin Owaisi : तिहेरी तलाक कायद्याला बेकायदेशीर संबोधत ओवैसी म्हणाले की, हा कायदा असंवैधानिक आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे समानतेच्या विरोधात आहे आणि मुस्लिमांची बदनामी करते. त्यांनी प्रश्न केला, ‘मोदी सरकार फक्त मुस्लिम महिला (हक्क) दिन साजरा करेल का? हिंदू, दलित आणि ओबीसी महिलांचे काय?’ AIMIM Chief Asaduddin Owaisi Says Triple Talaq Law In Unconstitutional And Asked Why Government Is Afraid Of Discussion On Pegasus


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तिहेरी तलाक कायद्याला बेकायदेशीर संबोधत ओवैसी म्हणाले की, हा कायदा असंवैधानिक आहे आणि याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हे समानतेच्या विरोधात आहे आणि मुस्लिमांची बदनामी करते. त्यांनी प्रश्न केला, ‘मोदी सरकार फक्त मुस्लिम महिला (हक्क) दिन साजरा करेल का? हिंदू, दलित आणि ओबीसी महिलांचे काय?’

    एआयएमआयएम प्रमुख म्हणाले की, या कायद्यामुळे महिलांचा अधिक छळ होईल आणि त्यांच्या समस्या वाढतील. फक्त खटले नोंदवले जातील, न्याय मिळणार नाही. मुसलमानांनी हे पूर्णपणे स्वीकारलेले नाही.

    त्याचवेळी, पेगासस हेरगिरी वादावर ओवेसींनी विचारले, ‘सरकार संसदेत पेगाससवर चर्चा करण्यास का घाबरत आहे? तुम्हाला काय लपवायचे आहे? आम्हाला संसद चालवायची आहे पण तुम्हाला नको आहे. तुम्हाला फक्त बिल पास करायचे आहे. ही लोकशाही आहे का? आम्हाला आमची मते मांडण्याची संधीही दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

    AIMIM Chief Asaduddin Owaisi Says Triple Talaq Law In Unconstitutional And Asked Why Government Is Afraid Of Discussion On Pegasus

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RCB : चिन्नास्वामी स्टेडियमवर किती पोलीस बंदोबस्ताला होते कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनाच माहिती नाही!!; दावा केला 5000 पोलिसांचा, होते 1000 पोलीस!!

    Sambit Patra : संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हटले- राहुल हे चीन-पाकचे पेड एजंट; त्यांचे शब्द सैन्याचा अपमान करणारे

    नोबेल पुरस्कार विजेता राज्यकर्ता मुघलांच्या परंपरेला जागला; बांगलादेशाने आपला “बापच” बदलून टाकला!!