भारतीय जनता पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे
विशेष प्रतिनिधी
हैदराबाद :Telangana तेलंगणा नंतर आता आंध्र प्रदेश सरकारनेही सर्व मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांना रमजान महिन्यात नमाज अदा करण्यासाठी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारने घेतलेल्या अशाच एका पावलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीनुसार, रमजानमध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना लवकर कार्यालय सोडण्याची पद्धत तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.Telangana
आदेशानुसार, इस्लाम धर्म मानणारे सर्व कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटी, आउटसोर्सिंग आधारावर नियुक्त केलेले व्यक्ती आणि गाव/वॉर्ड सचिवालयातील कर्मचारी रमजानमध्ये नमाज अदा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडू शकतात. संबंधित अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २ मार्च ते ३० मार्च या कालावधीत पवित्र रमजान महिन्यात सर्व कामकाजाच्या दिवशी आवश्यक धार्मिक विधी करण्यासाठी मुस्लिम कर्मचाऱ्यांना कार्यालये बंद होण्याच्या वेळेच्या एक तास आधी सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. मागील वर्षीप्रमाणेच – रमजान महिन्यात मुस्लिम कर्मचाऱ्यांना एक तास आधी कामावरून निघण्याची परवानगी देणारा जीआर जारी झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.
तेलंगणा सरकारने एक परिपत्रक जारी केले होते ज्यामध्ये मुस्लिम कर्मचाऱ्यांना रमजानच्या पवित्र महिन्यात एक तास आधी कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाने या निर्णयावर टीका केली आहे आणि हिंदू सणांमध्ये असे उपाय का केले जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपने सरकारच्या या कृतीला तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे.
After Telangana now this state too offers special discounts for Muslim employees for Ramadan
महत्वाच्या बातम्या
- Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
- Bihar : दिल्लीनंतर बिहारमध्येही हादरे ; सिवानमध्ये ४.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
- नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी नाही देता येत; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर प्रहार!!
- Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पावलाविरोधात आठवलेंची भूमिका