जय राजपुताना संघाच्या तक्रारीवरून, जयपूरच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
विशेष प्रतिनिधी
जयपूर : ‘Allahabadia Samay Raina इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये अपशब्द वापरल्याबद्दल अडचणीत सापडलेला युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर इलाहाबादिया, समय रैना आणि इतरांच्या अडचणी वाढत आहेत. अश्लील विनोद प्रकरणात जयपूरमध्ये रणवीर इलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Allahabadia Samay Raina
जय राजपुताना संघाच्या तक्रारीवरून, जयपूरच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये रणवीर इलाहाबादिया, समय रैना, आशिष चंचलानी, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्ध बीएनएस कायदा, आयटी कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाला दोनदा समन्स पाठवले आहेत. सेलने समय रैनाला १७ फेब्रुवारी रोजी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
समय रैनाच्या वकिलाने सायबर सेलला सांगितले होते की, समय रैना अमेरिकेत आहे आणि तो १७ मार्च रोजी देशात परतेल. त्याच वेळी, सायबर सेलने रैनाला १७ फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्स पाठवले होते, जे सेलने १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवले आहे. यापूर्वी, सायबर सेल पोलिसांनी या शोमध्ये सहभागी असलेल्या ४० जणांची ओळख पटवल्याचा दावा केला होता.
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सिद्धार्थ तेवतिया यासही समन्स बजावले आहे आणि म्हणणे नोंदवण्यास सांगितले आहे. तेवतिया या शोमध्ये जज म्हणून उपस्थित होते.११ फेब्रुवारी रोजी वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल रूपारेल यांनी दाखल केली आहे. याशिवाय रणवीर इलाहाबादिया, समय रैना, अपूर्व मखीजा तसेच शोच्या आयोजकांविरुद्ध लेखी तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे.
After Mumbai FIR filed against Ranveer Allahabadia Samay Raina and others in Jaipur
महत्वाच्या बातम्या
- Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
- Bihar : दिल्लीनंतर बिहारमध्येही हादरे ; सिवानमध्ये ४.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
- नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी नाही देता येत; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर प्रहार!!
- Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पावलाविरोधात आठवलेंची भूमिका