जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?; सर्व भक्तांना केलं आहे आवाहन After Hathras accident Bageshwar Dham government took a big decision will the satsang be held now
विशेष प्रतिनिधी
हातरस : बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांचा ४ जुलै हा जन्मदिवस आहे. हातरस दुर्घटनेपूर्वी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी बागेश्वर धाम येथे जोरदार तयारी सुरू होती. मात्र गर्दीच्या चेंगराचेंगरीमुळे हातरसमध्ये ज्याप्रकारे मोठी दुर्घटना घडली ते पाहता आता स्वतः धीरेंद्र शास्त्रीच लोकांना आपल्या जागेवर न येण्याचे आवाहन करत आहेत.
देश-विदेशात बागेश्वर धाम सरकारचे लाखो भक्त आहेत. 4 जुलैचा दिवस त्यांच्या प्रत्येक भक्तासाठी खूप खास आहे. प्रत्येकाला त्याला भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात. मात्र आता त्यांनी आपल्या भक्तांना त्यांच्या ठिकाणी न येण्याची विनंती केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करताना धीरेंद्र शास्त्री यांनी आवाहन केले आहे की त्यांच्या धाममध्ये भाविकांची गर्दी हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. यावेळी बागेश्वर धाम सरकाराचा जन्मदिवस त्रयोदशीच्या मुहूर्तावर येत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी खूप तयारी केली होती. मात्र हातरस दुर्घटनेनंतर बाबांचे टेन्शनही वाढले आहे. बागेश्वर धाम संदर्भात हा मोठा निर्णय घेत त्यांनी जनतेला विनंती केली आहे की, सर्व भाविकांनी घरूनच पूजा करावी आणि 4 जुलै रोजी बागेश्वर धाममध्ये येऊ नये. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरात आयोजित सत्संगात मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर त्यांना हा निर्णय घेणे भाग पडले.
बागेश्वर धाममध्ये आता सत्संग होणार नाही असं जर वाटत असेल तर तसे नाही . बागेश्वर धाम सरकारने व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ते ठोस तयारी करत आहेत. 21 जुलै रोजी येणाऱ्या आषाढ पौर्णिमेसाठी त्यांनी मोठ्या जागेची व्यवस्था केली आहे जिथे अधिकाधिक लोक त्यांच्या सत्संगाला आरामात उपस्थित राहू शकतील.
After Hathras accident Bageshwar Dham government took a big decision will the satsang be held now
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया, म्हणाले- हायकमांडचा निर्णय…
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; गट ‘क’च्या रिक्त पदांची भरती MPSC मार्फत; पेपरफुटीचा कायदाही येणार
- अग्निवीराबाबत राहुल गांधींनी लोकसभेत चालविला नॅरेटिव्ह खोटा; पण शहीद अग्निवीराच्या वडिलांनी सांगितला मदतीचा आकडा!!
- ‘राहुल गांधींनी माफी मागावी… संपूर्ण संत समाज..’ ; स्वामी अवधेशानंद संतापले