• Download App
    शालेय सुट्ट्यांवरून टीका सुरू झाल्यानंतर बिहार शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले...|After criticism started over school holidays the Bihar Education Department clarified

    शालेय सुट्ट्यांवरून टीका सुरू झाल्यानंतर बिहार शिक्षण विभागाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

    Bihar Education

    • भाजपाने नितीश कुमार सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमधील सरकारी शाळांमधील सुट्यांबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागानुसार, सामान्य आणि उर्दू शाळांसाठी सुट्टीचे कॅलेंडर वेगळे आहे. सामान्य शाळांमध्ये हिंदू सणांना आणि उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदच्या दिवशी अतिरिक्त सुट्टीची तरतूद करण्यात आली असल्याचं सांगितलं आहेAfter criticism started over school holidays the Bihar Education Department clarified

    महाशिवरात्री, वसंत पंचमी, जन्माष्टमी, रामनवमी आणि चित्रगुप्त पूजेला सर्वसाधारण शाळांना अतिरिक्त पाच सुट्या देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर उर्दू शाळांमध्ये ईद आणि बकरीदला प्रत्येकी तीन दिवस सुट्टी देण्याची तरतूद आहे.



    विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी शिक्षण विभागाने शाळांना सुटी देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. नवीन कॅलेंडरनुसार जन्माष्टमी, रक्षाबंधन, रामनवमी, शिवरात्री, तीज, वसंत पंचमीच्या सुट्या कमी करण्यात आल्या आहेत, तर ईद आणि बकरीदच्या सुट्ट्या प्रत्येकी ३ दिवस करण्यात आल्या आहेत.

    हे कॅलेंडर समोर आल्यानंतर भाजपने नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हिंदूंच्या सणांच्या सुट्या कमी करून मुस्लिमांच्या सणांच्या सुट्या वाढवल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी नितीश सरकारला धारेवर धरले होते. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी हिंदूविरोधी मानसिकता असलेला आणि हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. हिंदूंच्या सर्व सणांच्या सुट्ट्या रद्द करून मुस्लिम सणांच्या सुट्या वाढवण्यात आल्या. हे आम्ही कधीही मान्य करणार नाही.

    After criticism started over school holidays the Bihar Education Department clarified

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!

    Amit Shah : ‘सिंधू जल करार कधीही पूर्ववत होणार नाही’