• Download App
    Aditya L1 Mission : सूर्य मोहिमेवरील 'आदित्य L-1'ला आणखी एक यश, तिसर्‍यांदा कक्षा बदलली Aditya L1 Mission Another success for Aditya L1 on Sun mission third orbit change

    Aditya L1 Mission : सूर्य मोहिमेवरील ‘आदित्य L-1’ला आणखी एक यश, तिसर्‍यांदा कक्षा बदलली

    कक्षा बदलण्याची पुढील प्रक्रिया 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास पूर्ण होईल.

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू  : इस्रोच्या सौर मिशन आदित्य एल-1 ला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. वास्तविक, आदित्य एल-1ने तिसरी कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. भारतीय संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याबाबत माहिती दिली आहे. Aditya L1 Mission Another success for Aditya L1 on Sun mission third orbit change

    इस्रोच्या म्हणण्यानुसार, आदित्य एल1ने तिसऱ्यांदा कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. इस्रोने या प्रसंगी सांगितले की, आदित्य एल-1 ने बंगळुरू येथील इस्ट्रॅक सेंटरमधून तिसऱ्यांदा पृथ्वीची कक्षा बदलण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. आदित्य एल-1 मिशनची कक्षा बदलण्‍याची प्रक्रिया बंगळुरूमध्‍ये इस्रोच्‍या टेलीमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC)च्‍या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. यासह, मॉरिशस, बंगळुरू, पोर्ट ब्लेअर येथे असलेल्या इस्रोच्या ग्राउंड स्टेशनवरून मिशनच्या प्रक्रियेचा मागोवा घेण्यात आला.

    इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिशन आदित्य एल-1 ची नवीन कक्षा 296 किमी x 71767 किमी आहे. त्याची कक्षा बदलण्याची पुढील प्रक्रिया 15 सप्टेंबर रोजी पहाटे 2 च्या सुमारास पूर्ण होईल. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने 2 सप्टेंबर रोजी आपले महत्त्वाकांक्षी मिशन आदित्य एल-1 लाँच केले होते. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

    Aditya L1 Mission Another success for Aditya L1 on Sun mission third orbit change

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींवर प्रियांका गांधी भडकल्या; खरा – खोटा भारतीय तुम्ही नाही ठरवू शकत, म्हणाल्या; पण आता कोर्टाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्या विरोधात याचिका!!

    Rajya Sabha : CISF कमांडोंवरून राज्यसभेत गदारोळ; खरगे म्हणाले- निषेध करण्याचा अधिकार, नड्डा म्हणाले- ही अलोकतांत्रिक पद्धत

    Supreme Court : जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी 8 ऑगस्टला सुनावणी; कलम 370 हटवल्यानंतर झाला केंद्रशासित प्रदेश