‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मिशनवरही व्यक्त केले मत
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अनेक बॉलिवूड स्टार्स मोदींचे कौतुक करताना दिसत आहेत. कंगना रणौतपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक स्टार्स पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत आहेत. आता ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरीनेही मोदींचे कौतुक केले आहे. महिमा चौधरीने मोदी तिची प्रेरणा असल्याचे म्हटले आहे आणि ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ मिशनबद्दलही मत व्यक्त केले. Actress Mahima Chaudhary praised Prime Minister Narendra Modi
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना महिमा चौधरी म्हणाली, ‘ देश अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला जात आहे, परदेशात आपला आदर खूप वाढला आहे, प्रत्येकजण भारताकडे त्याच प्रकारे पाहत आहे ज्याप्रमाणे आपण अमेरिकीनकडे पाहत होतो. आपला देश पुढे जात आहे, आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे आणि आपल्या तरुणांकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत. आपल्या पायाभूत सुविधाही वाढत आहे.
महिमा पुढे म्हणाली, ‘तुम्ही पाहा, इतर देशांमध्ये त्यांच्या शेजारी देशांशी किती भांडणे सुरू आहेत, मग तो रशिया असो किंवा इतर कोणताही देश. येथे शांतता आहे आणि तुम्ही तुमचे काम मनापासून करू शकता. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्याचे श्रेय आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. ते खूप प्रेरणादायी आहेत, ते कुठून आले आहेत आणि त्यांनी ज्या प्रकारे प्रगती केली आहे, त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटते की तोही काहीतरी बनू शकतो आणि माझ्या मते, लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता फार कमी लोकांमध्ये असते.’
महिमा चौधरी यांनी पुढे पंतप्रधान मोदींना तिचे प्रेरणास्थान म्हटले. ती म्हणाली- ‘ते 24 तास काम करतात, अनेकवेळा जेव्हा मीही थकून जाते, तेव्हा मी त्यांना माझी प्रेरणा म्हणून घेते की मी घर चालवत आहे आणि ते देश चालवत आहे, त्यांना किती अडचणी येत असतील, ते हार मानत नाही. मी खूप प्रवास करते, जसे की आज मी बोधगयामध्ये आहे आणि कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी जाते.
Actress Mahima Chaudhary praised Prime Minister Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- महादेव सट्टा ॲपप्रकरणी भूपेश बघेलांविरुद्ध FIR; छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांसह 21 आरोपी
- मोदी म्हणाले- काँग्रेस आघाडी वापरते आणि फेकून देते, इंडिया आघाडी त्यासाठीच!
- राहुल + उद्धवचे “हिंदुत्व” मंदिरांमधून बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत आले; पण सावरकरांवर बोलायची हिंमत नाही दाखवू शकले!!
- प्रकाश आंबेडकर आले राहुल गांधींच्या व्यासपीठावर; पण खात्री नाही महाराष्ट्रात एकत्र लढण्यावर!!