• Download App
    AMBANI REACHEST PERSON : 24 तासाच्या आत फासा पलटला ! 'तो' ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर|AASHIAS REACHEST PERSON MUKESH AMBANI AGAIN

    AMBANI REACHEST PERSON : 24 तासाच्या आत फासा पलटला ! ‘तो’ ताज पुन्हा अंबानींच्या डोक्यावर

    रिलायन्स आणि अदानी समुहात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: देशातील दोन उद्योगपतींमध्ये चांगलीच स्पर्धा सुरू आहे.परवा आशियातील सर्वात श्रीमंत म्हणून गौतम अदानींचे नाव समोर आले मात्र शेअर बाजारातील चढ उतारांमुळे पुन्हा एकदा मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. AASHIAS REACHEST PERSON MUKESH AMBANI AGAIN

    अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी आणि रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांच्या उद्योग साम्राज्याची चर्चा जगभर होत असते.सध्या शेअर बाजार हा आशियातील सर्वात जास्त श्रीमंताच्या यादीत मोठा फेरबदल निर्माण करत आहे.



    बुधवारी अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचा फायदा गौतम अदानींना झाल्यानं ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले होते. पण शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्सनी पुन्हा एकदा उसळी घेतल्यानं मुकेश अंबानी परत एकदा आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

    गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा अवघ्या 600 मिलीयन डाॅलरनी मागं आहेत. परिणामी सध्या रिलायन्स आणि अदानी समुहात चांगलीच टक्कर पाहायला मिळत आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती सध्या 89.7 मिलीयन तर अदानी यांची संपत्ती 89.1 मिलीयन आहे. अदानी समुहाचं मार्केटमधील एकुण भाग भांडवल हे 10 ट्रिलीयन तर रिलायन्सचं भाग भांडवल 15.01 ट्रिलीयन डाॅलर इतकं आहे.

    दरम्यान, सौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्स एक मोठा करार करणार होती. पण करार रद्द झाल्यानं रिलायन्सला फटका बसला आहे. परिणामी सलग तीन दिवस रिलायन्सच्या भाग भांडवलात मोठी घसरण झाली आहे.

    AASHIAS REACHEST PERSON MUKESH AMBANI AGAIN

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Middle East : मध्य पूर्वेत 3 अमेरिकन युद्धनौकांची आगेकूच; यात 2200 सैनिक, खार्ग बेटावर ताब्याची तयारी

    Fighter Jets : भारताची नॉन-कॉन्टॅक्ट युद्धतंत्राची तयारी; 6व्या पिढीच्या फायटर जेट्सवर काम; संसदेत संरक्षण समितीचा अहवाल सादर

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालय म्हणाले – पत्नी मोलकरीण नाही, जीवनसाथी आहे:घटस्फोटाच्या प्रकरणात म्हटले – जेवण न बनवणे क्रूरता नाही, घरकाम पतीचीही जबाबदारी