• Download App
    Arvind Kejriwal गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमधल्या विजयामुळे केजरीवाल खुश, संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे आव्हान!!

    Arvind Kejriwal : गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमधल्या विजयामुळे केजरीवाल खुश, संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे आव्हान!!

    नाशिक : गुजरात आणि पंजाब मधल्या पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी जिंकल्याने अरविंद केजरीवाल खुश झाले. त्यांचा राजकारणात कमबॅक करायचा मार्ग खुला झाला. पण या कमबॅकमुळे संसदेत मात्र भाजप पेक्षा काँग्रेस पुढे मोठे आव्हान उभे राहणार आहे. Arvind Kejriwal

    गुजरात मधली विसावदर आणि पंजाब मधली लुधियानाची जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या. गुजरात मध्ये आम आदमी पार्टीने भाजपचा पराभव केला, तर पंजाब मध्ये काँग्रेसचा पराभव केला. पंजाब मध्ये राज्यसभा खासदार संजीव अरोरांनी विधानसभा पोटनिवडणुकीत बाजी मारल्याने आम आदमी पार्टीची राज्यसभेतली एक जागा खाली होईल. त्या जागेवर अरविंद केजरीवाल स्वतःची वर्णी लावून घेतील अशी चर्चा दिल्लीतल्या राजकीय वर्तुळात आहे. पण त्यामुळे संसदेमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या प्रभावी नेत्याचा प्रवेश झाल्यानंतर भाजप नेत्यांपेक्षा काँग्रेस नेत्यांपुढे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

    लोकसभेत राहुल गांधी विरोधी पक्ष नेतेपदी असल्याने तिथल्या चर्चेत त्यांची चलती चालते. त्या तुलनेत इतर विरोधी राजकीय पक्षांचे नेते फिके पडतात. कारण विरोधी पक्ष नेते पदावरच्या नेत्याला लोकसभेत बोलण्याची जास्त संधी मिळत असते. त्यानुसार राहुल गांधींना ती संधी आपोआपच मिळते. पण केजरीवाल यांची राज्यसभेत प्रवेश झाल्यानंतर काँग्रेसच्या तिथल्या प्रभावी नेत्यांपुढे मात्र मोठे आव्हान उभे राहू शकते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेत आहेत. केंद्रातले माजी अनुभवी मंत्री आणि ज्येष्ठ नेते म्हणून ते राज्यसभेत आपली छाप जरूर पाडतात, पण राहुल गांधींच्या पुढे किंवा सोनिया गांधींच्या पुढे त्यांना जाता येत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा राज्यसभेत पुरेसा दमदार प्रभाव पडतोच असे नाही.

    त्यामुळे केजरीवाल ज्यावेळी राज्यसभेत येतील, त्यावेळी ते काँग्रेसपेक्षा अधिक प्रभावी बाजू मांडत राहिले, तर इतर सगळे काँग्रेस नेते त्यांच्यापुढे फिके पडू शकतील. प्रभावी विरोधी खासदार म्हणून केजरीवाल यांच्यावरच राज्यसभेतला “फोकस” राहील. याचा सर्वाधिक राजकीय धोका भाजप पेक्षा काँग्रेसला अधिक संभावतो. कारण भाजपकडे जगत प्रकाश नड्डा यांच्यासारखे प्रभावी वक्ते आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन, त्यांच्याबरोबरच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे देखील राज्यसभेत आहेत. त्यामुळे राज्यसभेत भाजपकडे तशी तगडीत स्टार कास्ट आहे. सगळ्या विरोधकांमध्ये केजरीवाल कितीही प्रभावी ठरले, तरी भाजपची ही स्टार कास्ट त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, पण या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते मात्र राज्यसभेत फिके पडण्याची शक्यता आहे.

    AAP clinches victory in Visavadar (Gujarat) and Ludhiana West (Punjab) by-elections, party’s national convener Arvind Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rohit Sharma : रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ वर्षे पूर्ण; भावनिक पोस्ट शेअर केली

    Gujarat : गुजरातमधील काडी पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा विजय, काँग्रेसचा दारुण पराभव

    Shashi Tharoor : शशी थरूर यांनी पुन्हा पंतप्रधान मोदींचे केले कौतुक ; काँग्रेसचं टेन्शन वाढणार?