• Download App
    Adani Group : एनडीटीव्ही मध्ये गौतम अदानींची कंपनी एएमजीची 65% हिस्सेदारी, सकारात्मक आणि खुल्या चर्चेनंतर रॉय दांपत्य विकणार शेअर्स 65% stake of Gautam Adani's company AMG in NDTV

    NDTV : सकारात्मक गौतम अदानींना सगळेच शेअर विकल्यानंतर प्रणव व राधिका रॉय यांची इनिंग संपुष्टात!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील महत्त्वाची मीडिया कंपनी एनडीटीव्ही मध्ये गौतम अदानी यांची कंपनी एएमजी हिची 65 % हिस्सेदारी होणार आहे. सकारात्मक आणि खुल्या चर्चेनंतर प्रणव रॉय आणि राधिका रॉय हे दांपत्य एनडीटीव्ही मधले आपले शेअर्स अदानींना विकणारा असून त्यामुळे अदानींची एएमजी मीडिया लिमिटेड ही कंपनी एनडीटीव्हीची संपूर्ण मालकी असणारी कंपनी ठरणार आहे. 65% stake of Gautam Adani’s company AMG in NDTV

    गौतम अदानी यांच्या समवेत अतिशय सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाल्याचे पत्रक प्रणव रॉय आणि राधिका रॉय या दांपत्याने काढले आहे. एनडीटीव्ही हा देशातला विश्वासार्ह बातम्यांचा मीडिया ब्रँड आहे. त्यातले आमच्या वाट्याचे शेअर्स गौतम अदानी यांना विकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.

    गौतम अदानी यांच्या समावेत सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाली. आम्ही केलेल्या सर्व सूचनांना गौतम आदानी यांनी मान्यता दिली आहे. गौतम अदानी यांची एएमजी ही कंपनी आता एनडीटीव्हीची मालक असणार आहे. भविष्यात ही कंपनी आपली विश्वासार्हता जपून माध्यम क्षेत्रात आपला ठसा कायमचा टिकवेल, असा विश्वास रॉय दंपत्याने या पत्रकात व्यक्त केला आहे.

    एनडीटीव्हीचा अँकर रवीश कुमार याने काही मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आवाज बंद करण्यासाठी एनडीटीव्ही गौतम अदानी यांना विकत घ्यायला लावला, असा आरोप नुकताच केला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम अदानी यांच्याबरोबर सकारात्मक आणि खुल्या वातावरणात चर्चा झाल्याचे पत्रक एनडीटीव्हीचे आधीचे प्रमोटर्स प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांनी काढल्याने रवीश कुमार याच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    65% stake of Gautam Adani’s company AMG in NDTV

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे