• Download App
    airports देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू

    airports : देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी पुन्हा सुरू

    airports

    भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एएआयने या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केला आहे


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : airports भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये बऱ्याच काळापासून तणाव आहे. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असूनही, सुरक्षा दल पूर्ण सतर्कतेने तैनात आहेत. तथापि, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर अनेक विमानतळे उघडण्यात आली आहेत. देशातील ३२ विमानतळ नागरी उड्डाणांसाठी खुले करण्यात आले आहेत.airports



    भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच एएआयने या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केला आहे. १५ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत. ते तत्काळ सुरू करावेत, असे या निवेदनात म्हटले आहे. एएआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, १५ तारखेला सकाळी ५.२९ वाजेपर्यंत ३२ विमानतळ बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. पण आता ते लगेच उघडले जात आहेत.

    एएआयने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की, प्रवाशांना त्यांच्या एअरलाइन्सशी संपर्क साधण्याची आणि त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याची विनंती केली जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही एअरलाइन्सची वेबसाइट देखील पाहू शकता. सुरक्षेच्या कारणास्तव उच्चस्तरीय तपासणी केली जाईल, ज्यामुळे उड्डाणात विलंब होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    32 airports in the country reopen for civil flights

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट