वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी (जुम्मा) नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत यापुढे होणार नाही. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा मांडला होता. त्यावर सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, यासंबंधीच्या नियमांतील बदल एक वर्षापूर्वी करण्यात आला आहे. राज्यसभेच्या ८ डिसेंबरच्या व्हिडिओनुसार दुपारच्या भोजनानंतर दुपारी 2 वाजता बैठक सुरू झाली तेव्हा शिवा यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, दर शुक्रवारी सभागृहातील बैठक दुपारी २.३० वाजता सुरू होत होते. म्हणजे नमाजच्या ब्रेकनंतर ही बैठक व्हायची. या वेळी मात्र बैठक दोन वाजता सुरू करण्यात आले आहे. त्यावर सभापती धनखड म्हणाले, एक वर्षापूर्वीच त्याची सुरुवात झाली आहे.30-minute break for Jumma prayers in Rajya Sabha closed; Speaker Dhankhad said – the rules were changed a year ago
लोकसभा व राज्यसभा संसदेची दोन अंगे आहेत. राज्यसभेप्रमाणेच लोकसभेतही सर्व वर्ग व समुदायाचे लोक आहेत. त्यानंतर लोकसभेचे सत्र सामान्य दिवसाप्रमाणे शुक्रवारीदेखील दुपारी २ वाजता सुरू होते. दोन्ही सभागृहात एकरूपता आणण्यासाठी राज्यसभेत आधीच हा नियम तयार करण्यात आला. हे काही प्रथमच घडले नाही.