विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबर पर्यंत संपुष्टात आणणार आहे.Bihar Assembly elections
बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत असून तिच्या आत निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला भाग होते त्यानुसार निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. वर उल्लेख केल्याप्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यातली मतमोजणी एकाच दिवशी 14 नोव्हेंबरला होणार असून त्याच दिवशी निकाल लागून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबर पर्यंत संपविणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले.Bihar Assembly elections
अनेक नवे उपक्रम
बिहार विधानसभा निवडणुकीचे अनेक तपशील त्यांनी जाहीर केले असून त्यामध्ये व्हीव्हीपॅट मतमोजणीचाही समावेश आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्रावर आणि मतदान यंत्रावर मतदारांचे आणि उमेदवारांचे रंगीत फोटो असणार आहेत. राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व सुधारणा केल्या असून त्यांची पहिली अंमलबजावणी बिहार विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
भाजप आणि जदयू यांची युती आणि काँग्रेस राजद यांची महाआघाडी यांच्यात जबरदस्त टक्कर होणे अपेक्षित आहे. राहुल गांधींनी सुरुवातीपासून या निवडणुकीत लक्ष घातले आहे, पण बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी राहुल गांधी मात्र दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
Bihar Assembly elections: Polling to be held in two phases on “these” dates; Counting of votes on “these” dates!!
महत्वाच्या बातम्या
- भारताचे जागतिक व्यापार करार वाढले, तर उत्पादन क्षेत्रात भारताची मोठी झेप; जागतिक बँकेची ग्वाही
- Nirav Modi : नीरव मोदी म्हणाला- भारतीय तपास संस्था छळतील, प्रत्यार्पण प्रकरण पुन्हा उघडण्यासाठी लंडन न्यायालयात याचिका दाखल केली
- Bombay High Court : मुंबई हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांना हटवले, एक लाच घेतल्याबद्दल दोषी आढळले, तर दुसरे जप्त केलेल्या ड्रग्जचा वापर करत होते
- युतीत सडले, आघाडीत बळी ठरले; पण सगळीकडे खाऊन पिऊन हे समजायला उद्धव ठाकरेंना 35 वे वर्ष का लागले??