वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन शेतकरी आंदोलनाला हवा दिली आहे. शेतकरी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासंदर्भात वेगळे पाऊल उचलत देशात पाम लागवड वाढविण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. शेतकऱ्यांसाठी स्व विकासाचे एक नवे दालन यानिमित्ताने उघडले जात आहे.28 lakh hectare farmland is suitable for palm oil cultivation across India, out of which 9 lakh hectare land is in Northeast.
देशात तेलबिया उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने आखला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पाम लागवड हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. देशात 28 लाख हेक्टर जमीन पाम लागवडीसाठी उपयुक्त असल्याची माहिती कृषी शास्त्रज्ञांनी दिली आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.
28 लाख हेक्टर जमिनीपैकी काही लाख हेक्टर जमीन ईशान्येकडील राज्यांमध्ये उपलब्ध आहे, तर उर्वरित जमीन अंदमान निकोबार बेटांवर उपलब्ध आहे. या जमिनीवर टप्प्याटप्प्याने पाम वृक्षांची लागवड करून पाम तेलाचे उत्पादन देशातच वाढविण्यात येईल. यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देखील उपलब्ध करून देईल, असे तोमर यांनी स्पष्ट केले आहे. तेलबिया उत्पादनाच्यादृष्टीने देश स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणखीही महत्त्वाची पावले सुतोवाच तोमर यांनी केले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही महत्त्वाची घोषणा केली आहेच त्याचबरोबर शेतकऱ्यांना तेलबिया उत्पादन वाढ तसेच पाम वृक्ष लागवड या नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची द्वारे सरकारने खुली करून दिली आहेत.
28 lakh hectare farmland is suitable for palm oil cultivation across India, out of which 9 lakh hectare land is in Northeast.
महत्त्वाच्या बातम्या
- Drugs Case : शर्लिन चोप्राचे शाहरुख खानवर गंभीर आरोप, म्हणाली- बॉलीवूड स्टार्सच्या बायका त्यांच्या पार्ट्यांमध्ये ‘व्हाइट पावडर’ घ्यायच्या
- थॉमस नावाच्या ‘हॅकर’मुळे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप झाले होते ठप्प, आता अमेरिकेची एफबीआय मागावर
- Priyanka Gandhi Arrested : प्रियांका गांधींना अटक, शांतता भंग आणि कलम -144 चे उल्लंघन केल्याचा आरोप
- प्रियांका गांधी केंद्रस्थानी येत असल्याने अखिलेश यादव अस्वस्थ; निघाले उत्तरप्रदेशच्या रथयात्रेवर!!
- ‘तुम्ही शांततेची चर्चा करता, तिकडे तुमचे पंतप्रधान ओसामाला शहीद म्हणतात’ भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला फटकारले ।