• Download App
    मोदी सरकारच्या नऊ वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर! 25 crore people out of poverty in nine years of Modi government

    मोदी सरकारच्या नऊ वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर!

    NITI आयोगाच्या अहवालात करण्यात आला दावा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : 2013-14 ते 2022-23 या नऊ वर्षांमध्ये 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर पडल्याचे निती आयोगाने सोमवारी एका अहवालात म्हटले आहे. या काळात बहुआयामी दारिद्र्यात सर्वात मोठी घट उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात नोंदवली गेली. बहुआयामी दारिद्र्य हे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानातील सुधारणांच्या आधारे मोजले जाते. 25 crore people out of poverty in nine years of Modi government

    बहुआयामी दारिद्र्य नऊ वर्षांत 29.17% वरून 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत कमी झाले. NITI आयोगाच्या पत्रानुसार, भारतातील बहुआयामी दारिद्र्य 2013-14 मधील 29.17 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये 11.28 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. या कालावधीत सुमारे 24.82 कोटी लोक या श्रेणीतून बाहेर पडले आहेत.

    उत्तर प्रदेशात गेल्या नऊ वर्षांत 5.94 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. यानंतर बिहारमधील 3.77 कोटी, मध्य प्रदेशातील 2.30 कोटी आणि राजस्थानमधील 1.87 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले. अहवालात असेही म्हटले आहे की 2005-06 ते 2015-16 या कालावधीच्या तुलनेत 2015-16 ते 2019-21 दरम्यान गरिबीचे प्रमाण कमी होण्याचा वेग खूपच जास्त होता.

    25 crore people out of poverty in nine years of Modi government

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के