टीएमसीने भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एनआयएने शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेसच्या आठ नेत्यांना समन्स बजावले आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगरमध्ये २०२२ मध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात सर्वांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. टीएमसीने भाजपवर कट रचल्याचा आरोप केला आहे.2022 bomb blast case NIA summons eight Trinamool Congress leaders
केंद्रीय तपास यंत्रणेने आठ जणांना शनिवारी सकाळी 11 वाजता अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी पाठवण्यात आलेल्या समन्सनंतरही ते चौकशीत सहभागी झाले नाहीत, असे कारण देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना २८ मार्च रोजी कोलकाताजवळील न्यू टाऊन येथील एनआयए कार्यालयात येण्यास सांगण्यात आले.
3 डिसेंबर 2022 रोजी भूपतीनगरमध्ये स्फोटामुळे कच्च्या घराचे छत कोसळले होते. या काळात तीन जणांचा मृत्यू झाला होता. टीएमसी नेते कुणाल घोष यांनी शुक्रवारी एनआयएच्या या कारवाईमागे विरोधी भाजप असल्याचा आरोप केला. घोष यांनी दावा केला की भाजपने पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील टीएमसी नेत्यांची यादी केंद्रीय एजन्सीला दिली आहे. त्यांच्या घरावर छापे टाकून त्यांना अटक करण्याचा एनआयएचा विचार आहे.
2022 bomb blast case NIA summons eight Trinamool Congress leaders
महत्वाच्या बातम्या
- बांगलादेशात भारतीय वस्तूंच्या बहिष्काराच्या विरोधात पंतप्रधान हसीना; म्हणाल्या- आधी तुमच्या बायकांच्या भारतीय साड्या जाळून टाका
- दंड, व्याजासह 1700 कोटी रुपये भरा; इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची काँग्रेसला नोटीस!!; पण नोटीस पाठवण्यात काही बेकायदा घडलंय का??
- गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूचे “शहीदीकरण”; समाजवादी पार्टी करतेय मुस्लिम ध्रुवीकरण!!
- जयशंकर म्हणाले- पॅलेस्टिनींकडून घरे, जमिनी आणि हक्क हिसकावले; चिनी सीमा सुरक्षेच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही