गृहमंत्री शाह म्हणाले- शस्त्रे बदल घडवू शकत नाहीत.
विशेष प्रतिनिधी
सुकमा : Sukma छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. INSAS आणि SLR सह मोठ्याप्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. एका वर्षात आतापर्यंत ४१० नक्षलवादी मारले गेले आहेत.Sukma
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १६ नक्षलवाद्यांच्या खात्म्यावर म्हटले आहे की, ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत आणि हिंसाचाराचा अवलंब करतात ते बदल घडवू शकत नाहीत, फक्त शांतता आणि विकासच बदल घडवू शकतात. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली की हा नक्षलवादावरचा आणखी एक हल्ला आहे.
सुकमा येथे झालेल्या कारवाईत आमच्या सुरक्षा यंत्रणांनी १६ नक्षलवाद्यांना ठार मारले आणि मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त केली. गृहमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकार ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी अपडेट देताना सांगितले की, १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. दोन सैनिकांना किरकोळ दुखापत झाली आहे. या चकमकीत डीव्हीसीएम जगदीश मारला गेल्याचे वृत्त आहे.