• Download App
    बिपरजॉय वादळापासून बचाव; गुजरात मध्ये 56 रेल्वे गाड्या रद्द; उद्यापासून 95 रेल्वे गाड्या स्थगित 15th June 95 trains will remain cancelled due to the effect of Biparjoy

    बिपरजॉय वादळापासून बचाव; गुजरात मध्ये 56 रेल्वे गाड्या रद्द; उद्यापासून 95 रेल्वे गाड्या स्थगित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मध्ये सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याबरोबरच पाकिस्तानला धडकणार आहे. 15 जून रोजी याचा पर प्रत्यक्ष परिणाम दिसायला लागेल. 15th June 95 trains will remain cancelled due to the effect of Biparjoy

    पण त्यापूर्वीच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मदत आणि बचाव कार्य संदर्भातील पाऊले उचलली असून त्यातला पहिला भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या 56 गाड्या आज रद्द केल्या, त्याचबरोबर उद्यापासून 15 जून पर्यंत आणि त्यानंतर आवश्यकता भासेल तोपर्यंत एकूण 95 रेल्वे गाड्या स्थगित करण्यात आले आहेत.

    बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात मध्ये सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी तसेच पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर साधारण ताशी 125 किलोमीटर वेगाने धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने किनारपट्टीच्या भागातील जनतेला सावधानतेचा इशारा तर दिला आहेच. पण त्याचबरोबर प्रवासाची साधने आणि बाकीचे नुकसान होऊ नये या दृष्टीने रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच 95 रेल्वे गाड्या स्थगितही केल्या आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणामाचा एका बैठकीत आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आणि इंडिया सूचना दिल्या. गुजरात मुंबई येथे सतर्कतेचे आदेश दिले. राज्यातील यंत्रणांनाही सज्ज ठेवण्याचे आदेश दिले. संबंधित बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय गृह सचिव तसेच केंद्रातील वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    15th June 95 trains will remain cancelled due to the effect of Biparjoy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची