भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : म्यानमारमधील ‘अरकान’ या सशस्त्र गटाने केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराचे १५१ जवान आपला जीव वाचवण्यासाठी भारतात पळून आले आहेत. अरकानने तेथील लष्करी छावण्या ताब्यात घेतल्या, त्यानंतर हे सैनिक भारतात पळून आले आणि मिझोरामच्या लांगतलाई जिल्ह्यात पोहोचले. त्यांनी आसाम रायफल्सची मदत घेतली. यानंतर त्यांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे.151 soldiers who fled from Myanmar to India plead for help
आसाम रायफल्सच्या एका अधिकाऱ्याने शनिवारी (३० डिसेंबर) ही माहिती दिली. ते म्हणाले की, या सैनिकांची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी (डिसेंबर 29) आराकान आर्मीच्या सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील त्यांच्या तळांवर कब्जा केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. यानंतर म्यानमार आर्मीचे सैनिक शस्त्रे घेऊन पळून गेले आणि लांगतलाई जिल्ह्यातील तुइसांतलांगमध्ये आसाम रायफल्समध्ये पोहोचले.
अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सीमेजवळील भागात म्यानमार आर्मी आणि अरकान आर्मीच्या सैनिकांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे.
151 soldiers who fled from Myanmar to India plead for help
महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांना मोठा धक्का, उमेदवारी रद्द
- विनेश फोगटने खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत केले; बजरंग पुनिया म्हणाला- महिला कुस्तीपटूंसाठी सर्वात वाईट काळ
- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंचा पलड़ा पवारांवर भारी; पवारांच्या “राष्ट्रीय” राजकारणाची ही तर खरी “बारामती श्री”!!
- रशियाच्या बॉम्बहल्ल्यांनी युक्रेन हादरले, 122 क्षेपणास्त्रे, 36 ड्रोनने हल्ला; 24 जणांचा मृत्यू