वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील लीथू गावात सोमवारी सकाळी 10.30 वाजता दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जण ठार झाले आहेत. आसाम रायफल्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात वर्चस्व असलेल्या बंडखोर गटाने म्यानमारला जाणाऱ्या दहशतवाद्यांवर हल्ला केला होता. आतापर्यंत घटनास्थळावरून 13 मृतदेह बाहेर काढले असून त्यातल्या एकाही मृताची ओळख अजून पटलेली नाही.13 killed in Manipur firing between two groups; incidents in Kuki-dominated areas; Internet has resumed in the state since yesterday
ही घटना कुकी बहुल परिसरात घडल्याची माहिती आहे.
मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मे पासून हिंसाचार सुरू आहे. यामुळे सुमारे 182 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हजार लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. ते अनेक महिन्यांपासून मदत छावण्यांमध्ये राहत आहेत.
मणिपूर सरकारने काल (3 डिसेंबर) काही भाग वगळता संपूर्ण राज्यात 18 डिसेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत केली होती. राज्य सरकारने म्हटले होते – कायदा आणि सुव्यवस्थेत झालेली सुधारणा आणि मोबाईल इंटरनेट बंदीमुळे लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चंदेल आणि कक्चिंग, चुराचंदपूर आणि बिष्णुपूर, चुराचंदपूर आणि काकचिंग, कांगपोकपी आणि इम्फाळ पश्चिम, कांगपोकपी आणि इम्फाळ पूर्व, कांगपोकपी आणि थौबल आणि तेंगनौपाल आणि काकचिंग जिल्ह्यांदरम्यान 2 किमीच्या त्रिज्येत ही बंदी लागू राहील. राज्यात हिंसाचार भडकल्यानंतर मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.
लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणाले – मणिपूर समस्येवर राजकीय तोडगा गरजेचा
भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख राणा प्रताप कलिता यांनी मणिपूरची समस्या राजकीय आहे, त्यामुळे त्याचे निराकरणही राजकीय असले पाहिजे, असे म्हटले आहे. 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना कलिता यांनी ही माहिती दिली.
मणिपूरमध्ये घात लावून हल्ला, स्पेशल फोर्सच्या जवानासह दोन ठार, कांगपोकपी जिल्ह्यात ‘बंद’ची हाक
ते म्हणाले- हिंसाचार थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजकीय समस्येवर शांततापूर्ण तोडगा काढावा लागेल, त्यासाठी दोन्ही पक्षांना (कुकी आणि मेईती) प्रेरित केले पाहिजे. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यातही आम्हाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. पण कुकी आणि मेईतेई ध्रुवीकृत आहेत, म्हणून काही तुरळक घटना घडतात.राज्य सुरक्षा दलांकडून लुटलेली 4 हजार शस्त्रे अजूनही लोकांच्या हातात आहेत आणि हिंसाचारात वापरली जात आहेत, असेही कलिता यांनी सांगितले. जोपर्यंत हे लोकांकडून वसूल केले जात नाही. तोपर्यंत मणिपूरमध्ये हिंसाचार थांबणार नाही. सुमारे 5 हजार शस्त्रे लुटण्यात आली होती, त्यापैकी फक्त 1500 जप्त करण्यात आली आहेत.
13 killed in Manipur firing between two groups; incidents in Kuki-dominated areas; Internet has resumed in the state since yesterday
महत्वाच्या बातम्या
- ‘मिग्जोम’ चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशात धडकणार; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
- Chhattisgarh Result : हिंसाचारात मुलगा गमावलेल्या ईश्वर साहूंनी भाजपच्या तिकीटावर लढत काँग्रेसच्या मंत्र्याचा केला पराभव!
- मिझोराममध्ये ZPM विजयी, MNF सत्तेतून बाहेर, कॉंग्रेसला मिळाली फक्त एक जागा
- I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी जाणार नाही, म्हणाल्या…