• Download App
    लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया | The Focus India

    लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

    जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत आणि काय केली आहे मोठी घोषणा First reaction of Prashant Kishor on Lok Sabha election results

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जन सुराज अभियानाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता जागांबाबत कोणतेही मूल्यांकन करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही घोषणा केली. वास्तविक, प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजपला 280 किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. या निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत.

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रशांत किशोर म्हणाले की, ते पुन्हा कधीही आकड्यांच्या खेळात पडणार नाहीत. ‘नंबर चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.’ असंही त्यांनी सांगितलं.



    प्रशांत किशोर हे संपूर्ण देशात राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक निवडणुकांबाबत भाकीत केले होते, जे बऱ्याच अंशी खरे ठरले आहेत. यंदाही लोकसभा निवडणुकीबाबतही त्यांनी मोठे भाकीत केले होते. या निवडणुकीबाबत भाकिते करून ते संपूर्ण देशाच्या चर्चेत आले होते. एनडीएबाबत ते म्हणाले होते की, आकडा 300 ओलांडू शकतो, पण निकाल वेगळा लागला आहे.

    First reaction of Prashant Kishor on Lok Sabha election results

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार