प्रतिनिधी
मुंबई : कोण कुणाची “मातोश्री”; महाराष्ट्रात गाजतेय चौकशी!!, अशी अवस्था सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येत आहे. यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीचा उल्लेख आला. या मुद्द्यावरून महाराष्ट्रात “मातोश्री” या शब्दाभोवती राजकारण फिरत आहे.
कोण कुणाची मातोश्री आहे, हे चौकशीअंती पुढे येईलच. चौकशीतून कोणीही सुटणार नाही. अगदी “मातोश्री” देखील!!, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी टोमणा मारला आहे, तर हद्द झाली वांद्र्याच्या मातोश्रीला वाचवण्यासाठी यशवंत जाधव आपल्या आईचे नाव पुढे करत आहेत, असे खोचक ट्विट माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केले आहे. Yashwant Jadhav Diary kirit somaiya tweet
मात्र, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यशवंत जाधव यांची डायरीच खोटी ठरवली आहे. शिवसेनेत असली डायरी लिहिण्याची पद्धत नाही. यशवंत जाधव यांनी आईला 50 लाखांचे घड्याळ भेट दिले असेल दान धर्मासाठी पैसे दिले असतील, असा दावा त्यांनी केला आहे. एकूण महाराष्ट्राचे राजकारण नेमकी मातोश्री कोण आणि कुणाची या भोवती फिरू लागले आहे…!!
– संजय राऊत म्हणतात, यशवंत जाधवांची डायरीच खोटी
यशवंत जाधव यांचे डायरीच खोटी आहे. शिवसेनेत डायरी लिहिण्याची पद्धतच नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
यशवंत जाधव हे आपल्या आईला घड्याळ भेट देऊ शकत नाहीत का?, दान धर्मासाठी रक्कम देऊ शकत नाहीत का? तशी त्यांनी रक्कम त्यांनी दिली असेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.
यशवंत जाधव यांच्याकडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सापडलेल्या डायरीतील मातोश्री वर जोरदार चर्चा सुरु आहे. या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिले असल्याचा उल्लेख आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मातोश्री म्हणजे यशवंत जाधव यांची आई असू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. मी त्यांचे वक्तव्य पाहिले, त्यांनी आपल्या आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले असतील, असं राऊत म्हणाले.
डायरी हा काही पुरावा नाही
शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावे आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितले आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असे राऊत म्हणाले.
भाजपकडून बदनामी
पुढे संजय राऊत म्हणाले की, देवाच्या चरणी सर्वांनी खरं बोलायला हवे. तुम्ही जर हिंदुत्व मानत असाल, तर देवाच्या दरबारात आपण किती खरे बोलतो हे काही लोकांनी तपासायला हवे. महाराष्ट्रात षडयंत्र सुरु आहेत, कटकारस्थाने सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बदनामी करणे सुरू आहे, असे शरसंधान राऊत यांनी साधले.
Yashwant Jadhav Diary kirit somaiya tweet
महत्त्वाच्या बातम्या
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर