• Download App
    भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका|When in fear Shiv Sainiks remember Narayan Rane's criticism on Udhav Thakrey

    भीती वाटली की शिवसैनिक सत्तेचा विषय आला की मात्र आठवत नाही, नारायण राणे यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले आहे की सत्तेचा विषय आला की शिवसैनिक आठवत नाही आणि अशी भीती वाटल्यावर शिवसैनिक आठवतो. शिवसेनाप्रमुखांचा दरारा होता, तो आज दिसत नाही.When in fear Shiv Sainiks remember Narayan Rane’s criticism on Udhav Thakrey

    राणा दांपत्याला अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले,बाळासाहेब ठाकरे यांनी हात वर केला की लाखो शिवसैनिक जमायचे. मात्र उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर कुणीही शिवसैनिक बाहेर पडत नाही. इथे येण्यापूर्वी मी मुद्दाम मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या घराबाहेरचे शिवसैनिक मोजायले सांगितले होते.



    मातोश्रीच्या बाहेर फक्त २३५ शिवसैनिक आणि राणांच्या घराबाहेर केवळ १२५ शिवसैनिक उपस्थित आहेत.राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पोलिसांच्या सहकायार्ने सरकार पुरस्कृत गुंडगिरी सुरू असून, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटना आहे.

    भाजप लोकशाही मागार्ने चालणारा पक्ष असला तरी समोरून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

    When in fear Shiv Sainiks remember Narayan Rane’s criticism on Udhav Thakrey

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात म्हणाले- सत्यजित तांबेंचे बोलणे बालिशपणाचे, काय बोलावे आणि काय नाही हे शिकले पाहिजे