• Download App
    WATCH : महाराष्ट्रात तिघांचे सरकार आणि तिघेही लबाड, नीलेश राणेंची टीका । Watch BJP Leader Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt

    WATCH : महाराष्ट्रात तिघांचे सरकार आणि तिघेही लबाड, नीलेश राणेंची टीका

    Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt : महाराष्ट्रामध्ये तिघांचे सरकार आहे आणि तिघेही लबाड आहेत. या तीन लबाड पक्षांना भाजपला सामोरे जायचे आहे. आक्रमक झाल्याशिवाय शिवसेनेला कळत नाही. आम्ही त्या औलादींना ओळखतो. त्यांना तीच भाषा कळते, अशी खरमरीत टीका नीलेश राणे यांनी केली. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते. नीलेश राणे पुढे म्हणाले की, तो एक बिनकामाचा संजय राऊत बसलाय.. रोज उठून जॅकेट घालून तोच पत्रकार, तोच दांडा, त्याला दुसरे कामच नाही. पीआर एजन्सी काम करते. महाविकास आघाडी नाही, अशी टीका राणे यांनी केली. शिवसेना नुसती बोंबाबोंब करत असते. एवढ्या वर्ष तेच केले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणूस किती राहिला आहे. मुंबई पालिका म्हणजे शिवसेना,  त्याचा काय धंदा आहे. उद्धव ठाकरे कुठे धंद्यावर बसला आहे का. काय धंदा म्हणजे मुंबई पालिका अशी टीकाही त्यांनी केली.  Watch BJP Leader Nilesh Rane Criticized Maha Vikas Aghadi Govt

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Govt : UPA सरकारच्या आणखी 2 कायद्यांमध्ये बदल होणार, मनरेगानंतर शिक्षण आणि अन्न सुरक्षा अधिकार कायद्यात सुधारणांची तयारी सुरू

    Hyderabad : हैदराबादेत मंदिरात तोडफोड, दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारी जखमी, भाजपने म्हटले- हिंदू आणि मंदिरांना लक्ष्य केले जात आहे

    West Bengal : ED अधिकाऱ्यांवरील FIR ला SCची स्थगिती, I-PAC छापा प्रकरणात म्हटले- संस्थेच्या कामात अडथळा आणू नका, ममता सरकारला नोटिस