प्रतिनिधी
पुणे : उद्धव ठाकरे हे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणार नाहीत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हीच करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत केले Uddhav Thackeray will not do it, Modiji, you do it !!; Raj Thackeray’s Sakade
राज ठाकरे यांनी आपल्या पुणे येथे झालेल्या सभेत टीका करणा-या सर्वांवर चांगलाच निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यासोबतच अनेक मुद्दे मांडले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याची मागणी केली आहे.
– केल्या तीन मागण्या
माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी आहे. त्यांनी लवकरात लवकपर समान नागरी कायदा आणावा, या देशाची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी अजून एक कायदा आणावा आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण करुन टाका, अशा तीन मागण्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. ही मागणी पूर्ण करुन यांचं राजकारण मोडून काढा, असे आवाहनही त्यांनी केले.
– राजकारणासाठी एमआयएमला पोसलं
यांनी यांच्या राजकारणासाठी एमआयएमला मोठा केला. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमकडून हिंदू विरोधी भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. पण यांच्या एक लक्षात नाही आलं की आपण एक राक्षस वाढवत आहोत. आणि म्हणता म्हणता तिथे एमआयएमचा खासदार होऊन, या निजामाच्या औलादी महाराष्ट्रात येऊ लागल्या. अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
Uddhav Thackeray will not do it, Modiji, you do it !!; Raj Thackeray’s Sakade
महत्वाच्या बातम्या
- ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही, पण महामंडळाचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू; शरद पवारांचा शब्द!!
- पुण्यातल्या उद्याच्या राजसभेलाही 13 अटी!!; अयोध्या दौरा भोंगे यावर काय बोलणार??; प्रचंड उत्सुकता!!
- मनसे : संदीप देशपांडे, संतोष धुरींवरील गुन्हा तथ्यहीन; न्यायालयाची सरकारला चपराक!!
- पेट्रोल – डिझेल केंद्राकडून स्वस्त : पण महाराष्ट्र, बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या वेळी तरी प्रतिसाद देतील??