विशेष प्रतिनिधी
पुणे : तब्बल 16 वर्षे 8 महिन्यांनी नाशिकफाटा ते राजगुरूनगर दरम्यानचा टोल बंद करण्यात आला आहे. नाशिक महामार्गावर टोल वसुली करणारे चांडोली व मोशी येथील टोल नाके अखेर मुदत संपल्याने बंद करण्यात आले आहेत.Toll between Nashikphata and Rajgurunagar closed after 16 years and 8 months
नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतच्या तीस किलोमीटर अंतरादरम्यान दोन टोल नाके उभारण्यात आले होते. ते बंद झाल्याने नाशिक फाटा ते खेड पर्यंतचा रस्ता आता टोलमुक्त झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोशी व चांडोली येथील टोल वसुली बंद करण्यात आली.
नाक्यावर बसविण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक वसुली बूथ देखील बंद करण्यात आले आहेत. नाशिक फाटा ते राजगुरुनगर पर्यंतचा रस्ता गॅजेटनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
Toll between Nashikphata and Rajgurunagar closed after 16 years and 8 months
महत्त्वाच्या बातम्या
- क्रूज ड्रग्स रेव्ह पार्टीतून पकडलेल्या रिषभ सचदेव, प्रतीक गाबा, अमीर फर्निचरवाला यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने का सोडले?; नवाब मलिक यांचा खोचक सवाल
- किंग खानला मोठा दणका : BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती रोखल्या, प्री-बुकिंग असूनही जाहिराती रिलीज केल्या नाहीत
- चिपी विमानतळ उद्घाटन : शेजारी खुर्च्या तरीही ना नमस्कार, ना नजरेला नजर, ठाकरे-राणेंमधील बेबनाव कार्यक्रमातही तसाच
- काँग्रेसचे नेते लखीमपूरच्या मुद्द्यात “अडकले”; अखिलेश यादव मात्र विजय यात्रेवर निघाले