डॉ आंबेडकर लेखन व भाषण खंडाच्या ९ लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी ५ कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे. …. then the Republican Party will agitate against the state government; Ramdas Athavale warned the state government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे राज्य सरकारने तातडीने प्रकाशन करावे, अन्यथा आरपीआय कडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला
मुंबईत बोलताना केंद्रिय मंत्री आठवले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक आहेत. आणि त्यांचे साहित्य भाषण आणि लेखनाचे खंड प्रकाशित करण्यात महाविकास आघाडी सरकार दुर्लक्ष करीत आहे.
पुढे आठवले यांनी सांगितले की , डॉ आंबेडकर लेखन व भाषण खंडाच्या ९ लाख प्रति प्रकाशित करण्यासाठी ५ कोटींचा खरेदी केलेला कागद धूळ खात पडला आहे.ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. आणि जर हे भाषण आणि लेखन खंडांचे साहित्य प्रकाशित करण्यात राज्य सरकारने दुर्लक्ष केले तर राज्य सरकार विरोधात रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा ईशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
…. then the Republican Party will agitate against the state government; Ramdas Athavale warned the state government
महत्त्वाच्या बातम्या
- ऑनर किलिंगच्या घटनेनं औरंगाबाद हादरलं : अल्पवयीन भावानेच बहिणीची केली निर्घृण हत्या, हत्या केल्यावर सेल्फीही काढली
- उत्पादकांची द्राक्षे गोड व्हावीत, विशेष मदतीचे पॅकेज द्यावे, कर्जमाफी करावी; राजू शेट्टी यांची मागणी
- MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा
- वसीम रिझवींनी इस्लाम सोडून आजपासून स्वीकारला हिंदू धर्म, यति नरसिंहानंद यांनी दिला सनातन धर्मात प्रवेश
- प्रियंका चतुर्वेदी यांच्यापाठोपाठ शशी थरुर यांचाही संसद टीव्हीचा राजीनामा