विशेष प्रतिनिधी
जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघषार्ला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले.Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government
सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे हे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ठाकरे सरकारला आम्ही 2 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर, 2 सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलनं, त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government
महत्त्वाच्या बातम्या
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी
- केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांना जीवे मारण्याची धमकी, अमित शहा आणि नितीशकुमार यांना पत्र लिहून केली सुरक्षा वाढविण्याची मागणी
- मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे २ सप्टेंबरला राष्ट्रपतींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या एका खासदाराला निमंत्रण
- ओवेसींपासून ते कॉंग्रेसपर्यंत अफगाणिस्तानप्रश्नी सर्व राजकीय पक्ष एकत्र, अफगाणिस्तानच्या लोकांची मैत्री महत्त्वाची असल्याची मांडली भूमिका