विशेष प्रतिनिधी
जळगाव : ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे. Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government
मेटे म्हणाले, मराठा आरक्षणा बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे हे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ठाकरे सरकारला आम्ही २सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर राज्यभर धरणे आंदोलनं, त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या २ वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी २ मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतना मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघर्षाला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले, असा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षणप्रश्नी सरकारला जागे करणार
मराठा समाजाबद्दलचे प्रेम हे बेगडी व पुतना मावशीचे
ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस
राज्यव्यापी आंदोलन २ सप्टेंबरपासून छेडणार
छत्रपतींच्या स्मारकाबाबत दोन वर्षे निर्णय नाही