कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आज अवघ्या राज्यात रंगली आहे. कारणही तसंच आहे. तब्बल सोळा वर्षांनी ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले आहेत. दरम्यान, या सोहळ्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही किंवा नमस्कारही केला नाही. ठाकरे आणि राणेंमधील वितुष्ट अवघ्या राज्याला माहिती आहे, आज या कार्यक्रमावेळी हेच दिसून आलं. Sindhudurg Chipi Airport Inauguration Funcion CM Thackeray Union Minister Rane And Dy CM Ajit Pawar Present
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची चर्चा आज अवघ्या राज्यात रंगली आहे. कारणही तसंच आहे. तब्बल सोळा वर्षांनी ठाकरे आणि राणे एकाच मंचावर आले आहेत. दरम्यान, या सोहळ्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे पाहिलंही नाही किंवा नमस्कारही केला नाही. ठाकरे आणि राणेंमधील वितुष्ट अवघ्या राज्याला माहिती आहे, आज या कार्यक्रमावेळी हेच दिसून आलं.
विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतर अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. यावेळी केंद्रीय नारायण राणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार केला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार केला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे पाहिलं, ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं.
उद्घाटन सोहळा
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं. पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले. नंतर काही वेळातच राणे कोनशिलेजवळ आले. तब्बल 16 वर्षांनंतर राणे आणि ठाकरे एकाच मंचावर आले आहेत. हे दोघेही किमान एकमेकांना बोलतील अशीच सर्वांना अपेक्षा होता, पण तसे काहीही झाले नाही.
Sindhudurg Chipi Airport Inauguration Funcion CM Thackeray Union Minister Rane And Dy CM Ajit Pawar Present
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर
- लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपींना अटक का करत नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल