• Download App
    ३१ डिसेंबरला संपणार समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ; कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ नाही Sameer Wankhede's term ends on December 31; There is no extension in tenure

    ३१ डिसेंबरला संपणार समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ; कार्यकाळात कोणतीही मुदतवाढ नाही

     

    समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही.Sameer Wankhede’s term ends on December 31; There is no extension in tenure


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला होता . या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी १२ लोकांना अटक करण्यात आले. या क्रुझ पार्टीचा तपास एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केला होता.दरम्यान क्रूझ पार्टी प्रकरणाच्या तपासावरच उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

    यामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यामुळे एनसीबीकडून आर्यन खान प्रकरणाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली.समीर वानखेडे यांच्या कार्यकाळ संपण्यासाठी केवळ १३ दिवसांचा कालावधी उरला आहे. मात्र त्यांच्या मुदतवाढीचे कोणतेही संकेत आलेले नाही.



    समीर वानखेडे यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरला संपणार आहे.त्यामुळे समीर वानखेडेंना खुर्ची रिकामी करावी लागणा का? आणि समीर वानखेडेंच्या ऐवजी एनसीबीच्या विभागीय संचालकाच्या जागी आता नवीन अधिकारी येणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर मधल्या दिवसात समीर वानखेडे विरुद्ध नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होती.

    त्यानंतर समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीहून एनसीबीची स्पेशल टीम मुंबई दाखल झाली. त्यानंतर एनसीबीकडून समीर वानखेडे यांच्याकडे असलेली मुंबईतील काही प्रकरणे काढून घेण्यात आली.समीर वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

    Sameer Wankhede’s term ends on December 31; There is no extension in tenure

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ