जरी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणीही जुमानत नाही. म्हणून लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे.Resolve the issue of local travel before starting school, the teachers’ council demanded in a letter to Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हळूहळू सर्व शाळा सुरू होत आहेत. मुंबई आणि जवळच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये ४ ऑक्टोबरपासून सुरू केली जाणार आहेत; परंतू त्याआधी शिक्षक-शिक्षकेतर , कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या लोकल प्रवासासाठी स्वतंत्र आदेश जारी करावेत, अशी मागणी शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मुंबई आणि परिसरातील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मुंबईजवळ असलेल्या ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वसई, कर्जत, कसारा, बदलापूर, कल्याण, टिटवाळा आदींसह नवी मुंबई-पनवेल परिसरातून शाळांमध्ये येत असतात.
त्यामुळे त्यांच्या लोकल प्रवासाबाबत वेगळे आदेश काढण्याची मागणी शिक्षक आमदार नागो गाणार आणि शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.जरी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या प्रवासासाठी शिक्षण विभागाने आदेश काढले तरी त्याला कोणीही जुमानत नाही. म्हणून लोकल प्रवासासाठी सरकारनेच आदेश जारी करावेत अशी मागणी केली आहे.
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी आतापर्यंत कोणत्याही निश्चित सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण असून ते तातडीने दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
Resolve the issue of local travel before starting school, the teachers’ council demanded in a letter to Chief Minister Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार
- देशातील सक्रिय कोरोना बाधितांमध्ये केरळ पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, अर्धे रुग्ण केरळमध्येच
- गेल्या वर्षभरात गौतम अदानी आणि कुटुंबियांनी कमावले सर्वाधिक पैसे, अशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत
- NITI आयोगाचा अहवाल : जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रति १ लाख लोकांसाठी सरासरी २४ बेड , बिहार सर्वात कमी ६ बेड