प्रतिनिधी
अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व याचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले असून हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश आहे. विरोधकांचे नाही, असा टोला विरोधी पक्षांना लगावला आहे.Repeal of agricultural laws; This is not just the success of the peasant agitators, but of the opposition; Anna Hazare’s Tola
शेतकरी आंदोलन सुरू असताना आंदोलकांचे काही प्रतिनिधी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांना भेटले होते. त्यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली होती. परंतु, अण्णा हजारे यांनी काही कारणाने दिल्लीला येता येत नाही असे सांगून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये त्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील केले होते.
आज जेव्हा कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली त्याचे अण्णा हजारे यांनी स्वागत केले आहे. मात्र हे संपूर्ण यश फक्त शेतकरी आंदोलकांचे आहे. विरोधी पक्षांचा याच्याशी काहीही संबंध नाही, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना टोला हाणला आहे. विरोधी पक्ष शेतकरी आंदोलकांना अजूनही आंदोलन करण्यासाठी उकसवत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.
Repeal of agricultural laws; This is not just the success of the peasant agitators, but of the opposition; Anna Hazare’s Tola
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी