Naxal movement in slums : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो आहे. ही गंभीर बाब असल्याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त केली आहे. मुंबई – पुण्याबरोबरच अन्य शहरांमध्येही झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीचा प्रचार – प्रसार सुरू आहे. त्यावर अंकुश लावला पाहिजे, असे परखड मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. Propagation of Naxal movement in slums in Mumbai-Pune; The Chief Minister expressed concern to Amit Shah
प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय दिला जातो आहे. ही गंभीर बाब असल्याची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीत व्यक्त केली आहे. मुंबई – पुण्याबरोबरच अन्य शहरांमध्येही झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीचा प्रचार – प्रसार सुरू आहे. त्यावर अंकुश लावला पाहिजे, असे परखड मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अमित शहा यांनी नक्षलवाद प्रभाव असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, मुख्य सचिवांची आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतली तिला नवी दिल्लीत उपस्थित राहिले. परंतु बैठकीनंतर ते लगेच मुंबईकडे रवाना झाले. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली नाही.
तत्पूर्वी, या बैठकीत नक्षलवादग्रस्त राज्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ओरिसा, मध्य प्रदेश, तेलंगण, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश होता. कायदा आणि सुव्यवस्थे बरोबरच अमित शहा यांनी नक्षलग्रस्त भागांमधल्या विकास कामांचाही आढावा घेतल्याचे समजते. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी शहरी भागातील झोपडपट्ट्यांमध्ये नक्षली चळवळीच्या प्रसार-प्रचार याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे त्यांच्यासमवेत बैठकीला उपस्थित होते.
Propagation of Naxal movement in slums in Mumbai-Pune; The Chief Minister expressed concern to Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार
- Nagpur Education Policy : NEPला RSS किंवा ‘नागपूर शिक्षण धोरण’ म्हटले तर आनंदच मुख्यमंत्री बोम्मई
- कोरोना कालावधीतील सरकारी खर्चावरील निर्बंध उठले, अर्थ मंत्रालयाच्या सूचना, विभाग आता बजेटच्या अंदाजानुसार खर्च करू शकतील
- ‘कोणीही टाळी वाजवली नाही’, चिदंबरम यांचा पीएम मोदींच्या यूएनजीएच्या भाषणावर टोमणा, सिब्बल यांचीही टिप्पणी