विशेष प्रतिनिधी
सावरगाव बीड : दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये आज आपली उपस्थिती दर्शवली होती. पंकजा मुंडे या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून दाखल झाल्या. या वेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून लोकांवर फुलांचा वर्षावही केला. याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी ह्या फुलांचा वर्षाव केलेला नसून भगवानदादा आणि जनतेसाठी हा फुलांचा वर्षाव केला आहे.
Pankaja Munde targets the state government for the problems of corona and excess rainfall delayed compensation
पुढे त्या असंही म्हणाल्या की, आपण जिथे जन्म घेतला, त्या मातीचा आणि जातीचा कमीपणा वाटून घेऊन चालणार नाही. राजघराणं असो किंवा वंचित घराणं आपण जिथे जन्मलो त्या मातीची आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे.
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द होणार की काय असे वाटत असतानाही पंकजाताईंनी मेळाव्यामध्ये हजेरी लावली होती. या बाबतीत त्या म्हणाल्या की, पंकजाताईंना घरात बसलेले पाहून खुश झालेल्या लोकांना मी आज सांगते, मी उसाच्या फडात जाऊन लोकांशी संवाद साधणार, नाशिकच्या दौर्यावर जाणार, नवी दिल्ली, मुंबई येथे सर्वत्र जाणार. पण लोकोपयोगी कामे करणार. कोरोना काळामध्ये फक्त मी बाहेर पडले नाही पण घरात नुसती बसून नव्हते. आम्ही कोविड सेंटर सुरू केले होते. आम्ही घरोघरी डबे देखील पोहोचवले. औषधांची व्यवस्था देखील आम्ही यावेळी केली होती. कोरोना काळात तुम्हाला भेटायला आले असते तर चाललं असतं का तुम्हाला? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला.
कोरोना महामारी नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुसतंच पॅकेज जाहीर करून चालणार नाही तर प्रत्येकाच्या हातामध्ये मदत पोहोचवावी आणि आमची दिवाळी गोड करावी, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. राज्य सरकार कडून किंवा पालकमंत्र्यां कडून कोणती मदत शेतकर्यांपर्यंत पोहोचली नाहीये. जी काही मदत मिळाली आहे ती केंद्र सरकारकडून मिळाली आहे. ह्या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.
ऊसतोड कामगार मंडळाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, हे मंडळ आम्ही उभा केले पण याची म्हणावी तशी प्रगती आम्ही करू शकलो नाहीत. आणि असे का झाले याचे कारण देखील तुम्हाला माहित आहे अस त्या म्हणाल्या.
Pankaja Munde targets the state government for the problems of corona and excess rainfall delayed compensation
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंच वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले – निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
- भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; 7 नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय