• Download App
    वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजप नेत्याविरुद्धच एफआयआर; नवाब मलिक यांचा सोमय्यांवर पलटवार|Nawab malik targets kirit somya and ed officers

    वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याप्रकरणी भाजप नेत्याविरुद्धच एफआयआर; नवाब मलिक यांचा सोमय्यांवर पलटवार

    वृत्तसंस्था

    मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्या पुणे वक्फ बोर्डाची जमिन मी लाटली असे म्हणतात त्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुढच्या आठवड्यात भाजपच्याच एका नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल होणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी ईडीचे प्रवक्ते म्हणून मला धमकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा,Nawab malik targets kirit somya and ed officers

    असा प्रतिटोला महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.ईडीने मला समन्स पाठवावे. मी चौकशी आणि तपासाला हजर होईन, असेही त्यांनी सांगितले. पण ईडीचे अधिकारी महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.



    त्यापूर्वी, नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्यात, तेच “सरकारी पाहुणे” बनणार!!; अशा शब्दात किरीट सोमय्यांचा यांनी हल्लाबोल केला होता.

    नवाब मलिक यांनी आपल्या घरी “सरकारी पाहुणे” येणार असल्याचे ट्विट केले होते.या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी त्यांचा समाचार घेतला असून नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत. त्यांना केंद्रीय तपास संस्था आपल्या घरी येण्याची खात्री आहे, म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत

    . पण असे हात-पाय मारून चौकशी आणि तपास थांबणार नाही, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली आहे.

    किरीट सोमय्या यांचे हे ट्विट असे :

    नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, “माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत” माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे, ” जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा .. जमिन गोंधळात आपले नाव असेल…” “तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार… आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार.

    Nawab malik targets kirit somya and ed officers

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ