Navi Mumbai Municipal Corporation : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे वळावे लागले आहे. या माध्यमातून शिक्षण घेताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. नेटपॅक संपल्यामुळे अनेकांच्या शिक्षणात खंड पडतो. नवी मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नेटपॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 1 हजार रुपये जमा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. Navi Mumbai Municipal Corporation to deposit Rs 1000 in student’s bank account for Unlimited Net Pack
विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाकडे (Online Education) वळावे लागले आहे. या माध्यमातून शिक्षण घेताना इंटरनेट कनेक्टिव्हिटी (Internet Connectivity) अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. नेटपॅक (Net Pack) संपल्यामुळे अनेकांच्या शिक्षणात खंड पडतो. नवी मुंबई महापालिकेने (New Mumbai Municipal Corporation) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणात खंड पडू नये म्हणून नेटपॅकसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात 1 हजार रुपये जमा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे.
कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. एरवी जून महिन्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांना सुरुवात होत असते. तथापि, यावेळी कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर विसंबून राहण्याची विद्यार्थ्यांवर वेळ आली आहे. पहिल्या सहामाहीत शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्गात न भरवता ऑनलाईन पद्धतीनुसारच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.
विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता थेट नेटपॅकची रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालिकेच्या या विद्यार्थीहिताय निर्णयामुळे 35 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.
Navi Mumbai Municipal Corporation to deposit Rs 1000 in student’s bank account for Unlimited Net Pack
महत्त्वाच्या बातम्या
- नागपुरात अभिनेता संजय दत्तने नितीन गडकरींची भेट घेतली, पदस्पर्श करून घेतला आशीर्वाद
- जम्मू कश्मीर : पुलवामातील त्रालच्या बस स्टँडवर CRPF पथकावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, 7 जण जखमी, शोध मोहीम सुरू
- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अनलॉक मॉडेलचे उद्योगपतींकडून कौतुक, देशभर राबविण्याचे केले आवाहन
- कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेचा देशातील कृषी क्षेत्रावर परिणाम नाही, नीती आयोगाने व्यक्त केला विश्वास
- रेशन डिलिव्हरीप्रकरणी केजरीवाल यांच्यावर भाजपचा पलटवार, मुख्यमंत्र्यांकडून दिल्लीतील जनतेची दिशाभूल