कोरोनाचे दोन रूग्ण आढळूनही लोक मास्क लावत नसल्याचं आणि गर्दी करत असल्याचं चित्र आहे.NASHIK: Corona’s participation in All India Marathi Literary Conference; Two patients found
विशेष प्रतिनिधी
नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तीन रूग्ण संशयित आहेत. कोरोनाची दुसरी लाट हे साहित्य संमेलनातलं सर्वात मोठं विघ्न होतं. ती ओसरल्यानंतर साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याचं निश्चित कऱण्यात आलं. अशात आता याच साहित्य संमेलनात कोरोनाने शिरकाव केला आहे.
दरम्यान कोरोनाचे दोन रूग्ण आढळूनही लोक मास्क लावत नसल्याचं आणि गर्दी करत असल्याचं चित्र आहे.
इतकंच नाही तर कोव्हिड प्रतिबंधक व्यवहार म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉलही अनेक लोक पाळत नसल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या संमेलनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार तर नाही ना अशी भीती आता नाशिककरांना आहे. कोरोनामुळे हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं होतं. या संमेलनाच्या सुरूवातीपासूनच वादांची मालिका आणि अडथळ्यांची मालिका सुरू झाली. कोरोनाची दुसरी लाट हा यामधला सर्वात मोठा अडथळा होता.
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच या साहित्य संमेलनावर वाद आणि अडथळ्यांचं सावट आहे हेच दिसून येतं आहे.
मात्र संभाजी महाराजांवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकानंतर वादात सापडलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना साहित्य संमेलनात घडली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समारोपाला गालबोट लागलं आहे.
NASHIK: Corona’s participation in All India Marathi Literary Conference; Two patients found
महत्त्वाच्या बातम्या
- NASHIK : साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक ; सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …
- लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली दिलासादायक माहिती
- ११ डिसेंबरला मनसे महाराष्ट्रभर राबवणार ‘समुद्र किमारा स्वच्छता मोहीम’ ; अमित ठाकरेंनी केल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन
- ममता नव्हे, तर भाजप विरोधातला चेहरा यूपीए सामुदायिकरीत्या ठरवेल; भूपेश बघेल यांची नेतृत्वाच्या वादात उडी