Massive fire in Mumbai : मुंबईतील एका 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. जीव गमावलेल्यांपैकी दोघे वृद्ध आहेत. त्याचवेळी 19 जण भाजले. त्यापैकी 6 वृद्ध आहेत. ताडदेव परिसरातील कमला सोसायटी या इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली. Massive fire in Mumbai 20-storey building catches fire in Taddev area, 7 killed; 19 injured
प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील एका 20 मजली इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. जीव गमावलेल्यांपैकी दोघे वृद्ध आहेत. त्याचवेळी 19 जण भाजले. त्यापैकी 6 वृद्ध आहेत. ताडदेव परिसरातील कमला सोसायटी या इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली.
सुमारे ५ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नायर रुग्णालयात ५, कस्तुरबा रुग्णालय आणि भाटिया रुग्णालयात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
19 पैकी 3 जणांची प्रकृती गंभीर
मुंबई प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, धुरामुळे मदत कर्मचार्यांना आत पोहोचण्यास त्रास झाला. १९ जणांची सुटका करण्यात आली. प्रशासनाने 15 जणांना भाटिया रुग्णालयात दाखल केले आहे. 3 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित 12 जण जखमी झाले आहेत. सर्वांवर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत.
यापूर्वी 10 गंभीर जखमींना नायर रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यापैकी दोघांना मृत घोषित करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी तिघांचा मृत्यू झाला. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, धुरामुळे काही लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत लेव्हल थ्री आग लागली होती. ती इतकी भीषण होती की ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या लागल्या.
Massive fire in Mumbai 20-storey building catches fire in Taddev area, 7 killed; 19 injured
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देशातील टॉपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये मिळालं 5 स्थान, चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया
- मुंबईत २० मजली इमारतीत आगीचा भडका; दोन जण होरपळले, अग्निबंब घटनास्थळी
- पुणे : स्वाधार योजनेच्या लाभासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास 28 फेब्रुवाीपर्यंत मुदतवाढ
- दिल्लीतील मोजक्या कुटुंबांसाठीच पूर्वी देशात नवी बांधकामे झाली, पंतप्रधानांची नाव न घेता गांधी कुटुंबावर टीका
- कितना चंदा जेबमें आया म्हणत जुन्या सहकाऱ्यानेच केला केजरीवालांचा भांडाफोड, गैरकृत्ये प्रकाशात आणण्यासाठी काढली वेब सिरीज