• Download App
    मनोहर जोशींना राजीनामा द्यावा लागला होता, आता...का शिवसैनकांसाठी नियम वेगळे, नितेश राणे यांचा सवाल। Manohar Joshi had to resign, now ... why different rules for Shiv Sainiks, Nitesh Rane's question

    मनोहर जोशींना राजीनामा द्यावा लागला होता, आता…का शिवसैनकांसाठी नियम वेगळे, नितेश राणे यांचा सवाल

    इतिहास सांगतो, मनोहर जोशीजींना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम इथे लागू होतो का? की शिवसैनिकाचे नियम वेगळे आहेत?”, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. Manohar Joshi had to resign, now … why different rules for Shiv Sainiks, Nitesh Rane’s question


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : इतिहास सांगतो, मनोहर जोशीजींना त्यांच्या जावयावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. आज उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मेव्हण्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. हाच नियम इथे लागू होतो का? की शिवसैनिकाचे नियम वेगळे आहेत?”, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

    ईडीने पुष्पक ग्रुपच्या ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावरूनच भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे

    नितेश राणे म्हणाले की, थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचे नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झाले आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जाते. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा.

    Manohar Joshi had to resign, now … why different rules for Shiv Sainiks, Nitesh Rane’s question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील